AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut ED Raid : इंग्रजांचं धोरणच भाजप राबवतेय, अजून किती लोकांना तुरुंगात टाकणार?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

राज्यपालांनी कार्यालयात भाजप कार्यालय उघडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागलं आहे. धनुष्यबाण गोठविण्याच काम आता ते करणार आहेत.

Sanjay Raut ED Raid : इंग्रजांचं धोरणच भाजप राबवतेय, अजून किती लोकांना तुरुंगात टाकणार?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल
| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 1:01 PM
Share

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही मोठे विधान करत भाजपाला टार्गेट केले आहे. पटोले बोलताना म्हणाले की, आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू अस इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अमंलबजावणी भाजप सरकार करतय…संजय राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही. राऊतांवर दबाव आणि त्यांना ब्लॅकमेल (Blackmail) करण्यासाठी हि कारवाई केली जात असल्याचा धक्कादायक आरोप नाना पटोलेंनी केलायं. पटोले यांनी हे वक्तव्य संगमनेर येथे केले आहे.

पटोले यांनी केला भाजपावर गंभीर आरोप

बोलताना पटोले म्हणाले की, अजून किती लोकांना जेलमध्ये टाकायचं हे भाजपने ठरवावे. परंतु भारतातील लोकशाहीला ते सोप्या पद्धतीन हलवू शकणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. आपले पाप लपविण्यासाठी अशी कारवाई करणे हे नवीन नाही. अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलावून वातावरण बदललं गेलय. मुळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट आहे. राज्यपालांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला, जो घाव केला त्याला जनता कधी विसरणार नाही.

राज्यपालांनी कार्यालयात भाजप कार्यालय उघडले

राज्यपालांनी कार्यालयात भाजप कार्यालय उघडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागलं आहे. धनुष्यबाण गोठविण्याच काम आता ते करणार आहेत. एका पार्टीला संपवून आम्ही कसे जिवंत राहू अशा पद्धतीच घाणेरडे राजकारण 75 वर्षात कोणी केले नाही. हे खालच्या पातळीच आणि लोकशाहीला घातक राजकारण केंद्रातल भाजप सरकार करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटंले आहे.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.