AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनिल तटकरेंचं मुख्यमंत्रिपदाविषयी मोठं विधान, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, पुढची शपथ ही…

पमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 मे रोजीच्या मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रिपदावर केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे. या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मला गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं वाटतंय पण कुठे जमतंय, असं अजित पवार म्हणाले होते.

सुनिल तटकरेंचं मुख्यमंत्रिपदाविषयी मोठं विधान, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, पुढची शपथ ही...
ajit pawar and sunil tatkare
| Updated on: May 03, 2025 | 7:49 PM
Share

Sunil Tatkare On Ajit Pawar CM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 मे रोजीच्या मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रिपदावर केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे. या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मला गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं वाटतंय पण कुठे जमतंय, असं अजित पवार म्हणाले होते. असे असताना याच मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते सुनिल तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

पुढची शपथ ही मुख्यमंत्री म्हणून…

सुनिल तटकरे मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुका तसेच मुख्यमंत्रिपद यावर थेट भाष्य केलं. “अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा शपथ घेतलेली आहे. मात्र अजित पवार यांनी पुढची शपथ ही मुख्यमंत्री म्हणून घ्यावी हे स्वप्न आहे, असं सुनिल तटकरे यांनी बोलून दाखवलं. तसेच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर असे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांनी आतापर्यंत…

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे, हे लक्षात घेऊन आणि विचारांशी तडजोड न करता आम्ही सत्तेत सहभागी झालो. लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांना वाटलं की अजित पवार संपले. मात्र आम्हाला विश्वास होता. विधानसभा निवडणुकीत परिमाण वेगळा दिसला. अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिकवेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यांनी महाराष्ट्राचा समतोल विकास केला, अशी स्तुतीसुमनंही तटकरे यांनी उधळली.

आपण सगळे मिळून अधिक…

तसेच पुढे बोलताना देवेंद फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काम करताना साथ मिळते आहेच. पण आपण सगळे मिळून अधिक ताकद वाढवू आणि सरकार अधिक उत्तम चालेल यासाठी प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

अजित पवार मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं होतं. “राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय,” असं अजित पवार म्हणाले होते.

Follow Us
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं