पुणे: महाविकास आघाडीची सत्ता आली नसती तर जयंत पाटील आज भाजपमध्ये असते, भाजप नेते नारायण राणे यांनी केलेल्या या दाव्याची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खिल्ली उडवली आहे. राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले?, असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी राणेंच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. (supriya sule raction on on Narayan Rane’s statement)
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. राणे कोणत्या जयंत पाटलांविषयी बोलले मला माहीत नाही. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. मी स्वत: चार-पाच जयंत पाटलांना ओळखते. ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांविषयी बोलले असतील असं वाटत नाही, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, लवकरच ठाकरे सरकार पडणार असल्याच्या विरोधकातील दाव्यातील हवाही त्यांनी काढून घेतली. संघटना आणि कार्यकर्ते नीट ठेवण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतं, त्यांच्याकडे सरकारविरोधात बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून सरकार पडणार असं ते बोलत असतात, असंही त्या म्हणाल्या.
Video : UNCUT | Supriya Sule | ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवर सुप्रिया सुळेंचं स्पष्ट मत@supriya_sule pic.twitter.com/P0W51YUZKW
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या:
कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
भाजपमध्ये जाण्यासाठी कोणत्या नेत्याशी चर्चा केली ते जाहीर कराच; जयंत पाटलांचं राणेंना आव्हान
सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा
(supriya sule raction on on Narayan Rane’s statement)