AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, दरेकरांची राज्य सरकारकडे मागणी, तळीये गावातील जखमींची जे.जे. रुग्णालयात विचारपूस

आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा सर्व पूर्वपदावर झाल्यानंतर सरकार वरातीमागून घोडे नाचवणार असेल, योजनांवर भर देणार असेल, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, दरेकरांची राज्य सरकारकडे मागणी, तळीये गावातील जखमींची जे.जे. रुग्णालयात विचारपूस
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 26, 2021 | 11:11 PM
Share

मुंबई : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा प्रकोप होऊन हजारो लोक आपत्तीग्रस्त झाले आहेत. त्यांचं तात्काळ पुनर्वसन करण्याची गरज आहे. या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक स्वरुपात मदत द्यावी. सरकारने या संकटाच्या परिस्थितीत केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही. तर आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा सर्व पूर्वपदावर झाल्यानंतर सरकार वरातीमागून घोडे नाचवणार असेल, योजनांवर भर देणार असेल, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. (Praveen Darekar inquires about the injured in Taliye and sutarkund)

दरेकर यांनी आज अतिवृष्टीमुळे दरडीखाली सापडलेल्या पोलादपूर तालुक्यातील सुतारकुंड आणि महाड येथील तळीये गावांमधील रुग्णांची मुंबईतील जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. त्यावेळी संबंधित डॉक्टरांना रुग्णांची अधिक काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचनाही दिल्या. त्याचबरोबर कुठलीही मदत आवश्यक असल्यास भाजप आपल्यासोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी तळीये आणि सुतारकुंड गावातील जखमी रुग्णांना दिलं.

‘बेडवर असतानाही त्यांना भविष्याची चिंता लागून राहिली आहे’

भेदरलेल्या मनस्थितीमध्ये असलेल्या लोकांना आधार आणि दिलासा देण्याची गरज आहे. जे. जे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची परिस्थिती काय आहे? त्यांच्यासाठी उपाययोजना काय आहे? हे पाहण्यासाठी आलो. आज ते बेडवर असतानाही त्यांना भविष्याची चिंता लागून राहिली आहे. हे जखमी लोक सध्या मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत, असं दरेकर यावेळी म्हणाले.

राज्यात पूरग्रस्त नागिरकांचे पुनर्वसन तातडीने करण्याची आवश्यकता आहे. अत्यंत दयनीय परिस्थिति उद्भवली आहे. निसर्गाचा कोप झाल्यामुळे या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. अनेक रुग्ण स्थिरावलेले असले तरी काही रुग्णांचे हात किंवा पाय कामातून गेले आहेत. शेवटी त्यांचा जीव वाचविण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा त्यांच्या पुनर्वसनाची काळजी घ्यावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या :

Chiplun Flood : चिपळूणच्या तिवरे गावाला मुसळधार पावसाचा तडाखा, 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावले!

केवळ डोकं बाहेर, सगळं अंग चिखलात रुतून, 24 तास धडपड, दरडीला गाढणाऱ्या आजीचा थरार

Praveen Darekar inquires about the injured in Taliye and sutarkund

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...