AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत करा; आरपीआयची मागणी

अतिवृष्टीमुळे मुंबईत भांडुप, विक्रोळी, चेंबूर, चांदीवली या भागात दरड आणि भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत करा; आरपीआयची मागणी
Ramdas Athavale
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 7:05 PM
Share

मुंबई : अतिवृष्टीमुळे मुंबईत भांडुप, विक्रोळी, चेंबूर, चांदीवली या भागात दरड आणि भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु ही रक्कम कमी असून त्यात वाढ करून सांत्वनपर मदत म्हणून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आली आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली. (Help 10 lakhs to families of those who died in the landslide; RPI demand)

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी चेंबूरच्या भारतनगर येथील बीएआरसी ची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी रिपाइंचे संजय डोळसे, सुभाष साळवे, सोपानराव खंडागळे, संतोष कांबळे, विष्णू मस्के, प्रमोद इंगळे आदी उपस्थित होते.

वाशीनाका येथील भारत नगर मध्ये बीएआरसीची भिंत कोसळून 15 जण मृत्युमुखी पडले आहेत.विक्रोळी पंचशील नगरमध्ये 5 जण दरड कोसळून मृत्यूमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना रिपाइंतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली

डोंगराळ भागातील झोपडीवासीयांचे पुनर्वसन करण्याची गरज

मुंबईतील डोंगराळ भागातील झोपडीवासीयांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे अनेक वेळा मुंबई मनपाकडे केली गेली आहे. मुंबई मनपा मात्र पावसाळा आल्यानंतर जागी होती. झोपडीवासीयांकडे राज्य शासन आणि मुंबई मनपाने मानवतेच्या दृष्टीने पाहून झोपडीवासीयांचे सुरक्षितस्थळी कायमचे पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी गौतम सोनवणे यांनी केली आहे.

पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी दरड कोसळणे, भिंत कोसळणे अशा दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. त्यात आता आणखी दुर्घटना घडू नयेत, म्हणून राज्य सरकार आणि मुंबई मनपाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या : 

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई का तुंबली?; पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद; वाचा सविस्तर

(Help 10 lakhs to families of those who died in the landslide; RPI demand)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.