AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. (Chembur- Vashi-naka landslide)

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप
ashish shelar
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 3:23 PM
Share

मुंबई: चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असून मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar attacks bmc over landslide incident in chembur mumbai)

आशिष शेलार यांनी आज वाशीनाका येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेवर टीका केली. मी महापौरांवर बोलणं टाळत आहे. या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का? त्यामुळे महापौरांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

राज्य सरकारनेही मदत करावी

आज घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेत दगावलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांसाठी सर्वांनीच मदत केली पाहिजे. महापालिकेने या नागरिकांचं पुनर्वसन करावं. त्यांची राहण्याची व्यवस्था करावी. धोकादायक भिंत काढावी. राज्य सरकारनेही मदत करायला हवी, असं ते म्हणाले.

सत्तेत असलेल्यांनी काय निर्णय घेतला?

या दुर्घटनेबद्दल आपण संवेदना प्रकट केल्या आहेत. ते ठिक आहे. पण या लोकांना सावरण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. जे सत्तेत आहेत त्यांनी काही निर्णय घेतला की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

आढावा बैठक नाही

मुंबईच्या झोपडपट्टीत आढावा बैठक, पूर्वनियोजित बैठक घेण्यात आलेली नाही. दुर्देवाने संपूर्ण मुंबईत हे चित्रं पाहायला मिळत आहे. मुंबईत विजेच्या गतीने यंत्रणा उभी करण्याची महापालिकेची क्षमता आहे. पालिकेकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. पण इच्छाशक्तीचा अभाव आहे, असं त्यांनी सांगितलं. मुंबई महापालिका जनतेच्या जीवाशी खेळत आहे. एवढे बळी गेले. त्याला निष्काळजीपणा जबाबदार असून सामान्य माणसाला मात्र ते भोगावं लागत आहे, असं ते म्हणाले. (ashish shelar attacks bmc over landslide incident in chembur mumbai)

संबंधित बातम्या:

Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

Mumbai Landslide : मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

(ashish shelar attacks bmc over landslide incident in chembur mumbai)

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....