AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात स्वप्न पूर्ण करायचीयेत? मग चाणक्य यांनी सांगितलेले हे गुण आत्मसात करा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य म्हणतात माणसांमध्ये काही गुण असणे गरजेचे असतात, हे गुण जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तेव्हाच तो आपली स्वप्न पूर्ण करतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

Chanakya Niti : आयुष्यात स्वप्न पूर्ण करायचीयेत? मग चाणक्य यांनी सांगितलेले हे गुण आत्मसात करा
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 9:47 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील बाबींशी संबंधित अनेक गोष्टींवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाचा स्वभाव हाच सर्व गोष्टींसाठी कारण असतो. एखादा माणूस श्रीमंत होतो, प्रचंड यश मिळवतो, सर्व प्रकारच्या सुख सुविधेचा उपभोग घेतो, तो त्याच्या स्वभावामुळे त्याच्याकडे असलेल्या काही खास गुणांमुळे तर एखादा माणूस आयुष्यभर कंगाल राहतो, त्याच्या हातात कधीच पैसा टिकत नाही. जगण्यासाठी संघर्ष करतो याला देखील त्या माणसामधले काही गुणच कारणीभूत असतात. माणसाने आयुष्यात तीन गुण जर आत्मसात केले तर असा माणूस आपल्या आयुष्यात कधीही अपयशी होणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विवेक – चाणक्य म्हणतात विवेक हा माणसाकडे असलेला सर्वात मोठा गुण आहे. जो माणूस विवेकी असतो, तो आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाही, विवेक म्हणजे वाईट आणि चांगलं यातील फरक ओळखण्याची क्षमता. चाणक्य म्हणतात जो माणूस आपल्यासाठी वाईट काय आहे? आणि चांगलं काय आहे, हे ओळखतो तो आयुष्यात अपयशी ठरत नाही.

योग्य निर्णय घेण्याची ताकद – चाणक्य म्हणतात ज्या माणसाला परिस्थिती पाहून निर्णय घेणं जमतं, यश त्यालाच मिळतं, असा माणूस आयुष्यात कधी अपयशी ठरत नाही.

साहस – चाणक्य म्हणतात साहस हा असा गुण आहे, जो प्रत्येक व्यक्तीकडे असलाच पाहिजे, जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीची रिस्क घेत नाही, तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच, संघर्षाला घाबरून जाऊ नका, तर साहस दाखवा, त्यातून मार्ग काढा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......