AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात स्वप्न पूर्ण करायचीयेत? मग चाणक्य यांनी सांगितलेले हे गुण आत्मसात करा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य म्हणतात माणसांमध्ये काही गुण असणे गरजेचे असतात, हे गुण जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तेव्हाच तो आपली स्वप्न पूर्ण करतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

Chanakya Niti : आयुष्यात स्वप्न पूर्ण करायचीयेत? मग चाणक्य यांनी सांगितलेले हे गुण आत्मसात करा
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 9:47 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील बाबींशी संबंधित अनेक गोष्टींवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाचा स्वभाव हाच सर्व गोष्टींसाठी कारण असतो. एखादा माणूस श्रीमंत होतो, प्रचंड यश मिळवतो, सर्व प्रकारच्या सुख सुविधेचा उपभोग घेतो, तो त्याच्या स्वभावामुळे त्याच्याकडे असलेल्या काही खास गुणांमुळे तर एखादा माणूस आयुष्यभर कंगाल राहतो, त्याच्या हातात कधीच पैसा टिकत नाही. जगण्यासाठी संघर्ष करतो याला देखील त्या माणसामधले काही गुणच कारणीभूत असतात. माणसाने आयुष्यात तीन गुण जर आत्मसात केले तर असा माणूस आपल्या आयुष्यात कधीही अपयशी होणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विवेक – चाणक्य म्हणतात विवेक हा माणसाकडे असलेला सर्वात मोठा गुण आहे. जो माणूस विवेकी असतो, तो आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाही, विवेक म्हणजे वाईट आणि चांगलं यातील फरक ओळखण्याची क्षमता. चाणक्य म्हणतात जो माणूस आपल्यासाठी वाईट काय आहे? आणि चांगलं काय आहे, हे ओळखतो तो आयुष्यात अपयशी ठरत नाही.

योग्य निर्णय घेण्याची ताकद – चाणक्य म्हणतात ज्या माणसाला परिस्थिती पाहून निर्णय घेणं जमतं, यश त्यालाच मिळतं, असा माणूस आयुष्यात कधी अपयशी ठरत नाही.

साहस – चाणक्य म्हणतात साहस हा असा गुण आहे, जो प्रत्येक व्यक्तीकडे असलाच पाहिजे, जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीची रिस्क घेत नाही, तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच, संघर्षाला घाबरून जाऊ नका, तर साहस दाखवा, त्यातून मार्ग काढा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड