Arijit Singh: अरिजीत सिंहने ‘या’ कारणासाठी सोडलं पार्श्वगायन; जवळच्या व्यक्तींनीच सांगितलं सत्य
Arijit Singh quit playback singing: अत्यंत लोकप्रिय गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अचानक त्याने इतका मोठा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना सतावत होता.

देशातील सर्वांत लोकप्रिय गायकांपैकी एक, पार्श्वगायनाच्या विश्वातील प्रसिद्ध नाव, अनेक सुपरहिट गाण्यांना आपला देणारा गायक अरिजीत सिंह… याने जेव्हा मंगळवारी (27 जानेवारी 2026) संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट लिहित पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. अरिजीतने या पोस्टमध्ये असंही स्पष्ट केलं होतं की संगीत विश्वाशी त्याचं नातं कायम राहील आणि यापुढेही तो संगीत निर्मिती करत राहील. परंतु तो चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करणार नाही. ज्या पार्श्वगायनाने अरिजीत सिंहला फक्त देशभरातच नाही जगभरात ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली, त्याला त्याने अवघ्या वयाच्या 40 व्या वर्षीच सोडण्याचा इतका मोठा निर्णय का घेतला? अनुराग बासू यांनी सांगितलं कारण अरिजीतने दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या ‘बर्फी’, ‘जग्गा जासूस’, ‘ल्युडो’, ‘मेट्रो इन दिनों’ यांसारख्या चित्रपटांमधील अनेक गाणी गायली...
