Tiger : ‘वाघा’वरुन विदर्भातील दोन वाघ आमने-सामने, वनमंत्र्यांच्या घरासमोर वाजवणार ढोल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक..

Tiger : वाघाच्या हल्ल्यावरुन विदर्भात राजकारण तापले आहे..

Tiger : वाघावरुन विदर्भातील दोन वाघ आमने-सामने, वनमंत्र्यांच्या घरासमोर वाजवणार ढोल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक..
वाघावरुन राजकारण तापले
Image Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Nov 29, 2022 | 10:14 PM

नागपूर : वाघाच्या हल्ल्यावरुन (Tigers Attack) विदर्भात राजकारण तापले आहे. वाघाच्या हल्ल्यात आठवड्याला दोन बळी जात आहे. काही लाख मिळाल्याने गेलेला माणूस परत येणार आहे का? असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. जर या प्रश्नावर राज्य सरकारने योग्य दखल घेतली नाही. वेळीच कारवाई केली नाही तर राज्याच्या वनमंत्र्यांना जागं करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

मानवी जीव वाघापेक्षा जास्त महत्वाचे आहे. वनप्राण्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पण ही संख्या किती असावी, त्यासाठी काही मर्यादा असायला हव्यात, असे वडेट्टीवार म्हणाले. विदर्भात वाघाच्या हल्ल्यात दर आठवड्याला दोघांचा बळी जात असल्याचे ते म्हणाले.

वाघाची संख्या 200 च्यावर गेल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार (Sudhir Mungantiwar) छाती ठोकपणे सांगत आहेत. वाघांच्या हल्ल्यात बळी जात असताना त्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल त्यांनी केला.

वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या माणसांना सरकारी मदत देण्यात येत आहे. केवळ 25-30 लाख रुपये दिले म्हणजे मनुष्याची किंमत ठरते का? पण राज्याच्या वनमंत्र्यांनी माणसाच्या आयुष्याची किंमत ठरविल्याचा आरोप त्यांनी केली.

वाघांसाठी जेवढा परिसर लागतो. तेवढा ठेवावा. इतर वाघ तातडीने हलवावेत. त्याअगोदर ज्या जंगल परिसरात हे वाघ हलविण्यात येतील, त्या परिसरातील गावात व्यवस्था करणे आवश्यक आहे. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष वाढलेला असल्याने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि तातडीने उपाय योजना न केल्यास, राज्याच्या वनमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना दिला आहे.