Gadchiroli Tiger : गडचिरोलीत नरभक्षक वाघाची दहशत, दोन दिवसांत दोन नागरिकांचा बळी

तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केलंय.

Gadchiroli Tiger : गडचिरोलीत नरभक्षक वाघाची दहशत, दोन दिवसांत दोन नागरिकांचा बळी
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 3:04 PM

गडचिरोली नरभक्षक वाघाने दोन दिवसात दोन नागरिकांचा बळी घेतलेला आहे. परवाच्या दिवशी उसेगाव परिसरात एका शेतकऱ्यांचा बळी घेतला. काल रात्रीच्या वेळी गुराच्या रक्षणासाठी जंगलात झोपलेल्या इसमावर हल्ला करून ठार केलं. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी उसेगाव येथे गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक बोलावली.

गावकरी व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व सीसीएफ कार्यालयाला भेट देतील. तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हा नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केलंय.

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील कळमटोला येथे ६५ वर्षीय व्यक्ती सरपण गोळा करण्यासाठी गेला होता. या व्यक्तीवर नरभक्षक वाघाने हल्ला करून ठार केली. ही घटना ९ सप्टेंबरला शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. कृष्णा ढोणे असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

हे सुद्धा वाचा

घटनेनंतर पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह गडचिरोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. गडचिरोली, आरमोरी आणि वडसा तालुक्यात नरभक्षी वाघाच्या हल्ल्यातीन बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गडचिरोली नरभक्षक वाघाने गुरुवारी एका शेतकऱ्यांचा बळी घेतला. सिटी वनच्या नरभक्षक वाघाने हल्ला केला. शेतीच्या कामासाठी जंगलात गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर नरभक्षक वाघाने हल्ला केला. एका शेतकऱ्याने पळ काढल्याने त्याचे जीव वाचला. परंतु एक शेतकरी जागीच ठार झाला. ठार झालेल्या शेतकर्‍यांचे नाव प्रेमपाल तुकाराम प्रधान आहे.

देसाईगंज तालुक्यातील उसेगाव परिसरात ही घटना आहे. या नरभक्षक वाघाला ताबडतोब जेरबंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. परंतु, वनविभाग याकडं विशेष लक्ष देत नसल्याचं दिसतं.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.