AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या महाराष्ट्रात ड्रग्स विकले जातायेत, तरूण-तरूणी… राज ठाकरे कडाडले; थेट आकडेवारी सांगितली!

Raj Thackeray : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ड्रग्सच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अख्ख्या महाराष्ट्रात ड्रग्स विकले जातायेत, तरूण-तरूणी... राज ठाकरे कडाडले; थेट आकडेवारी सांगितली!
Raj Thackeray Image Credit source: X
| Updated on: Mar 19, 2026 | 9:30 PM
Share

आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. राज्यातील तरुण-तरूणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

राज्यावरील कर्ज वाढले

राज ठाकरे यांनी म्हटले की गेल्या काही वर्षांमध्ये राज्यावरील कर्जात मोठी वाढ झाली आहे. 2014 पूर्वी राज्यावर 2 लाख कोटी कर्ज होते, मात्र त्यानंतर आतापर्यंत 11 लाख कोटी कर्ज झाले आहे. असं असलं तरी शहरे कोलमडून पडली आहेत. पिज्जा 10 मिनिटात येतो, पण सामान्य मानसाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही फुटपाथ जाम आहेत, सगळीकडे ट्रॅफिक आहे. ग्रामीण भागातील लोक शहराकडे येऊ इच्छित आहेत, मात्र शहराचे नियोजन नाही.

तरूणी-तरुणी व्यसनाधीन होत आहेत

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, मात्र संपूर्ण राज्यात ड्रग्स विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्स जातायेत, शाळांमध्ये ड्रग्स जातायेत. तरूणी-तरुणी व्यसनाधीन होत आहेत. काय करणार आहोत आपण महाराष्ट्राचं. ग्रामीण भागात प्रगती होत नाही, ग्रामीण भागातील मुलं-मुली शहरात येत आहेत, शहरं बकाल पडली आहेत. शहरामध्ये ड्रग्स मिळत आहेत, लहान मुली मुलं पळवली जात आहेत.

मुलं बेपत्ता होतायेत…

राज ठाकरे यांनी लहान मुलांच्या गायब होण्याची आकडेवारी सादर केली. त्यांनी म्हटले की, नोहेंबर डिसेंबरमध्ये 36 दिवसांमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली आहेत. त्याआधी जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या काळात नवी मुंबईत 499 मुलं बेपत्ता झाली होती, महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मुले पालकांना मिळाली, मात्र त्यातील 41 मुलं बेपत्ता आहेत. NCRB च्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी 4500 ते 5500 मुलं बेपत्ता होतात. 2022 मध्ये 5398 आणि 2023 मध्ये 4619 मुले बेपत्ता झाली आहेत. यात मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत दरवर्षी 2000 पेक्षा जास्त होतात अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली आहे.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.