AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant : आम्हीच खरी शिवसेना, दुसरा शिंदे गट स्थापन केला नाही, उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

उदय सामंत म्हणाले, विनायक राऊत यांनी केलेली टीका ही खिलाडू वृत्तीने घेतली. कार्यालय सोडणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. चांगल्या कार्यालय शुभ कार्यालय त्यांनी सोडू नये

Uday Samant : आम्हीच खरी शिवसेना, दुसरा शिंदे गट स्थापन केला नाही, उदय सामंत यांची स्पष्टोक्ती
उदय सामंत यांची स्पष्टोक्ती
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 22, 2022 | 2:56 PM
Share

रत्नागिरी : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत म्हणाले, आम्ही शिवसेनाच आहोत. आम्ही शिंदे नावाचा दुसरा गट स्थापन केला नाही. गट स्थापन करून दुसरीकडे कुठे आम्ही जाणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विचार घेवून पुढे जातोय. मातोश्री शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) हायजॅक करावा, अशी कुठलीही आमची भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उदय सामंत म्हणाले, न्यायालयीन लढा आम्ही लढत आहोत. शिंदे यांच्यासोबत कायदेशीर लढाईत आम्ही आहोत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका करणे आपल्या राजकारणात बसत नाही. दर पाच वर्षानी आम्ही निवडणुका लढत आलोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील आमदार हा भगवा घेतलेला आणि खासदारसुद्धा शिवसेनेचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंनी दौरा करायचा की नाही हा त्यांचा अधिकार

विरोधक राष्ट्रपती निवडणुकीबाबत शिंदे यांच्याबाबत अपप्रचार करत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आणि बहुमतावेळी युतीचे आकडे वाढत गेलेत. एकनाथ शिंदे यांना धोका होता. त्या अनुषंघाने तत्कालीन गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी बैठक पण घेतली होती. त्यानंतर हा प्रसंग घडलाय. तो प्रसंग शंभुराजे यांनी सांगितला आहे. यात अजून काय घडलं हे शंभूराजे देसाई सांगू शकतील. उद्धव ठाकरे यांनी दौरा करायचा की, नाही करायचा हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही शिवसेनेत आम्ही गद्दार नाही. हीच भूमिका आम्ही सर्वोच्च न्यायलायात मांडलीय. शिवसेना आणि भाजपचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. तर शिवसेना-भाजपचे उपमुख्यमंत्री हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत.

विनायक राऊतांची टीका खिलाडू वृत्तीने घेतली पाहिजे

उदय सामंत म्हणाले, विनायक राऊत यांनी केलेली टीका ही खिलाडू वृत्तीने घेतली. कार्यालय सोडणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. चांगल्या कार्यालय शुभ कार्यालय त्यांनी सोडू नये. रामदास कदम यांच्या संपर्कात कोकणातून कोण याची चर्चा केली. रामदास कदम यांनी घेतलेली भूमिका मोठी आहे. संभाजीनगर पासून ते दौरा सुरु करणार आहेत. बाळासाहेबांचा विचारा पक्का करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर्व सामान्यांचा शाखा प्रमुख मुख्यमंत्री झाला याचा अभिमान आहे. मंत्रीमंडळ विस्तार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसा लवकरच विस्तार होईल, असंही सामंत यांनी सांगितलं.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?