AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे घालता, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे. (Uddhav Thackeray asked question to bjp on alliance with Nitishkumar )

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
| Updated on: Oct 25, 2020 | 8:04 PM
Share

मुंबई : संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे घालत आहात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे. कोरोना संकटातही भाजपनं सरकार पाडण्याचं काम केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडण्याचं काम झाले, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. हा देश म्हणजे कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray asked question to bjp on alliance with Nitishkumar )

क्रांतिकारकांनी लाठ्या काठ्या खाऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. इंग्रजांच्या साम्राज्यावरचाही सूर्य मावळला. कन्याकुमारी ते काश्मीर देशात सर्वत्र तुम्हाला सत्ता आणायची होती. मात्र, भाजपला आता ते करता येणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.

हरियाणातील बिष्णोईंसोंबत जो डाव खेळला तोच डाव शिवसेनेविरुद्ध खेळला. तोच डाव बिहार मध्ये होतोय. देशाची विल्हेवाट लागत चालली आहे. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे घालत आहात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. नितीशकुमारांनी कोणती लस दिली असा सवाल ठाकरेंनी राज्यापालांचे नाव न घेता विचारला.

जीएसटीची पद्धत अपयशी ठरली आहे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं आणि जीएसटीवर आवाज उठवला पाहिजे. आपला जीएसटीचा पैसा द्यायला केंद्र तयार नाही. कर्ज काढायचा प्रस्ताव दिला गेला त्याला आम्ही विरोध केला आहे.

मी मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख आहे. जीवंत दहशतवादी पकडण्याचं काम मुंबई पोलिसांनी केले. जगात इतर कुठल्याही देशाला जमलं नाही. कोरोनाचे संकट आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या संकटातही फक्त सरकार पाडण्याचे काम होणार असेल तर देशात अराजक माजेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

CM Uddhav Thackeray Speech | हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

(Uddhav Thackeray asked question to bjp on alliance with Nitishkumar )

Follow Us
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.