AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा, हा तर खोकासूर आणि धोकासूर; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला फटकारलं

ही ठाकरे कुटुंबीयांची कमाई आहे. या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. यावेळचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता.

आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा, हा तर खोकासूर आणि धोकासूर; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला फटकारलं
उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला फटकारलंImage Credit source: TV9
| Updated on: Oct 05, 2022 | 8:32 PM
Share

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) आज शिवाजी पार्क येथे पार पडतोय. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात तुफान फटकेबाजी केली. आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा आहे, हा तर खोकासूर आणि धोकासूर आहे, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर (Uddhav Thackarey criticized on Shinde Group) केली आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटातील वादानंतर उद्धव ठाकरे मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

आता शिवसेनेचं काय होणार असा अनेकांना प्रश्न पडला होता. माझ्या मनात चिंता नव्हती. आज शिवतीर्थावरील गर्दी पाहून अरे बापरे गद्दारांचं कसं होणार असा प्रश्न त्यांना पडला असेल. ही गर्दी भाड्याने आणलेली नाही.

तासाचाी बोली लावून आणलं नाही. यापैकी कुणालाही विचारा. बुजुर्ग आहेत, दिव्यांग आहेत, गावाहून पायी चालत आले आहेत. त्यांनाही विचारा. तिथे एक एक एकटाच आहे. इकडे एकनिष्ठ आहेत. जे शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले हे एकनिष्ठ आहेत.

उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाचा समाचार

ही ठाकरे कुटुंबीयांची कमाई आहे. या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. यावेळचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता किती झाला. डोक्यांचा नाही खोक्यांचा. पन्नास खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे, अशा शब्दात उद्धव यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.