AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानीला प्रश्न विचारला, चमचे का वाजत आहेत?; उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना खोचक टोला

काल दुर्घटना झाली. स्फोट झाला त्यात ९ जणांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहतो. विषय केवळ कंपनीपुरता नाही. तर नऊ जणांसाठी नाही. हँडग्रेनेड बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. म्हणजे देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. त्याबाबत तरी आपल्याला बोलू दिलं. तो विषय पुन्हा चर्चेला येईल तेव्हा सविस्तर चर्चा होऊन, अपघात होता की घातपात होता का हे समोर आलं पाहिजे. गेल्या काही दिवसात असे स्फोट झाले आहेत. याची तरी नीट चौकशी होईल आणि खबरदारी घेतली जाईल ही अपक्षा आहे.

अदानीला प्रश्न विचारला, चमचे का वाजत आहेत?; उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना खोचक टोला
uddav and raj thackeray Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 18, 2023 | 5:14 PM
Share

नागपूर | 18 डिसेंबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या अदानी विरोधातील मोर्चाची खिल्ली उडवली आहे. यांना आता मोर्चे काढायला सूचलं का? सेटलमेंटसाठी मोर्चा काढला काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मी अदानीला प्रश्न विचारला. चमचे का वाजत आहेत? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच कृपया कोणीही अर्धवट माहिती घेऊन बोलू नये. माहिती घेऊनच बोलावं, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता काढला आहे. उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे.

मला आता कळायला लागलं अदानीचे चमचे कोण कोण आहेत. आम्ही प्रश्न अदानीला विचारला, चमचे काय वाजत आहेत? आंदोलन केल्यानंतर विषय काय हे विचारून बोलतात, त्यांनी अर्धवट माहितीवरून बोलू नये. अर्धवट माहितीवर विचारू नये. शालीचं वजन पेलतं की नाही ते पाहायला पाहिजे. अर्धवट माहितीवर विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही. विमानाला टोल लागत नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना झाडावर बसवू नये, अशी खोचक टीका करतानाच आम्ही धारावीकरांसाठी रस्त्यावर उतरलो. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विकास हवा. आमचं सरकार असताना आम्ही द्विधा मनस्थितीत होतो. टेंडर काढावं की सरकारच्या माध्यमातून विकास करावा याची मनात चलबिचल होती. पण त्यापूर्वीच आमचं सरकार पाडलं. त्यासाठी तर आमचं सरकार पाडलं नाही ना? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सेटलमेंट कशी होणार?

उद्धव ठाकरे यांनी सुपारी घेऊन मोर्चा काढल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? भाजप असती तर सेटलमेंट झाली असती. त्यामुळे सेटलमेंटचा प्रश्नच येत नाही, असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

चंद्रावरून लोकं आणली

ठाकरेंच्या मोर्चाला मुंबईतील लोक नव्हती, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. आमच्या मोर्चाला मुंबईतील लोकं नव्हती, धारावीतील लोकं नव्हती. मोदींनी चंद्रावरून वाहतूक सुरू केली आहे. ती सर्व माणसे चंद्रावरून आणली होती. पण प्रश्न धारावीचे होते. त्यांनीच चांद्रयान सुरू करून वाहतूक सुरू केली आहे. हे लोक मुंबई विकण्यासाठी अदानींची चमचागिरी करत आहेत. त्याची लाज वाटते, अशी टीका त्यांनी केली.

दुरान्वयेही संबंध

नागपूर अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. पण अधिवेशनाच्या सुरुवातीलाच एसआयटी लावा, हे लावा ते लावा सुरू झालं. तेव्हाच मनात पाल चुकचुकली. यांना हे अधिवेशन भरकटवायचं असल्याचं दिसून आलं. आरोप समोरून झाल्याने लगेच चौकशी लावता. दुरान्वयाने संबंध नसतानाही चौकशी लावतात. मग आम्ही जे काही पुरावे मांडतो त्याची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं, असं त्यांनी बडगुजर प्रकरणावर बोलताना सांगितलं.

इक्बाल मिर्चीला सर्टिफिकेट देणार का?

त्या कुटुंबाचा दाऊदशी काही संबंध नाही असं उपमुख्यमंत्री म्हणाले. ठिक आहे. मग तसं सर्टिफिकेट इक्बाल मिर्चीला देणार आहात का? या अधिवेशनाची सुरुवात नवाब मलिकांवरील आरोपाने झाली. आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता. सत्तेपुढे किंवा देशापुढे त्यांना सत्ता महत्त्वाची वाटत नाही, असा उपमुख्यमंत्री लाभल्याचं पाहून ऊर भरून आला. बाजूला मुख्यमंत्री असूनही पत्र लिहून देतात आणि इशारा देतात हा केवढा मोठा देशभक्तीचा नमूना होता. आम्ही पत्र दिलं. इक्बाल मिर्चीचं काय? प्रफुल्ल पटेलाचं काय? मलिक स्वच्छ झाले कोणतं गोमूत्र शिंपडलं? पटेलांचं काय? तत्परतेने खुलासा केला हे पाहून धन्यता आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क... धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश