AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची चर्चा

छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर मुख्यमंत्री झाले असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची चर्चा
| Updated on: Oct 14, 2022 | 12:01 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम तसा, भुजबळांच्या पंचाहत्तरीचा होता. पण गाजवला उद्धव ठाकरेंनी. छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर मुख्यमंत्री झाले असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भुजबळांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त, प्रत्येकांनी भुजबळांच्या आठवणी सांगितल्या. अजित पवारांनी भुजबळ, सरकार वाचवण्यात कसे पटाईत आहेत, हे उदाहरण देऊन सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आधीच सांगायला हवं होतं असा टोला लगावला.

शिवसेनेला पुन्हा मशाल चिन्हावर लढण्याची वेळ आलीय. याच चिन्हावरुन भुजबळही 1985 मध्ये शिवसेनेकडून लढले आणि जिंकलेही. ती आठवण सांगताना प्रफुल्ल पटेलांनीही उद्धव ठाकरेंना उद्देशून, हशा पिकवला.

छगन भुजबळांनी राजकीय कारकीर्द शिवसेनेपासूनच सुरु झाली. महापौरांपासून ते आमदार भुजबळांना शिवसेनेनंच केले. भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेबांनाही मानसिक धक्का बसला होता, हेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

सध्या उद्धव ठाकरेंसाठी कसोटीचा काळ आहे. पण, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस भक्कमपणे उभी आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानापाठोपाठ, ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला. त्यावरुन अजित पवारांनी सत्याचाच विजय होत असल्याचं म्हटलं, त्यानंतर ठाकरेंनी शिंदे आणि भाजपला आव्हान दिले.

भुजबळ मुंबईतले शिवसेनेचे पहिले महापौर झाले. मात्र, त्याचवेळी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी, त्यावेळी बाळासाहेबांच्या मतांच्या विरोधात जावून शिवसेना कशी सोडली ?, तो किस्साही भुजबळांनी सांगितला.

भाषण म्हटलं भुजबळ आपल्या हटके स्टाईलनं फटकेबाजी करतातच. आपल्याच वाढदिवसाच्या कार्यक्रमातही भुजबळांचा बिनधास्त अंदाज दिसला.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.