AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर तात्काळ निकाल लागणार, न्यायलयाने केवळ ‘ही’ अट टाकावी; उल्हास बापट यांनी कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला

SC on CM Eknath Shinde Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही मिनिटात लागणार; त्याआधी उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबी सांगितल्या...

तर तात्काळ निकाल लागणार, न्यायलयाने केवळ 'ही' अट टाकावी; उल्हास बापट यांनी कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 11, 2023 | 11:40 AM
Share

पुणे : राज्यातील सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे. या निकालात सर्वोच्च न्यायलय नेमकं काय म्हणतं. त्यांचा निर्णय काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या निकालाआधी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. तर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी निकाल उशीरा लागणार असल्याचं म्हटलं आहे.

न्यायलयाने केवळ ‘ही’ अट टाकावी- बापट

घटनेत सर्वोच्च स्थानी जनता आहे. आमदार अपात्र ठरल्यानंतर पुन्हा निवडून येईपर्यंत ते अपात्र असतात. विधानसभा अध्यक्षांकडे हा विषय आला तर त्यांनी त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाने त्यातील पळवाटा बंद कराव्यात. 15 दिवसांत निर्णय द्यावा अशी अट न्यायालयाने घालावी, असं उल्हास बापट म्हणालेत.

भारतीय घटनेचा अर्थ लावण्याचे अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. विधानसभा अध्यक्षांना तो बंधनकारक असेल. अपात्र ठरवल्यानंतर कोणी बहुमत सिद्ध करू शकले. राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते, असंही उल्हास बापट म्हणालेत.

हा खटला इतके दिवस चालू राहणे हेच मुळात चुकीचं आहे. आज निकाल लागत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. 2-3 लोक एकावेळी बाहेर गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर ते वाचतात. पण 16 जण एकाच वेळी बाहेर पडले पण ते 2-3 होत नाहीत. त्यामुळे ते अपात्र ठरतात, असं उल्हास बापट म्हणालेत.

ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर पक्ष आणि पक्ष चिन्हासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. स्टेटस्को अँटी आदेश दिल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. अपात्र ठरवल्यानंतर कोणी बहुमत सिद्ध करू शकले नाही तर, असंही बापट म्हणाले आहेत.

असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

सत्ता संघर्षाचा निकाल साधारणता एक वाजता येईल. आधी दिल्लीच्या एका केस निकाली आणि मग आपल्या राज्याच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात होईल त्यामुळे थोडासा वेळ जाईल. हा निकाल देशाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असेल, असं असीम सरोदे म्हणाले आहेत.

पक्षांतर बंदी सारख्या कायद्याला नवं वळण देणारा हा निकाल असू शकतो. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच पाठवलं जाईल. न्यायालय कायद्याच्या अनेक बाजू पाहून हा निकाल देईल आणि अध्यक्षांना देखील न्यायालय काही नियम घालून देईल, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार