AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी रक्तदान करुन अर्ज भरला, आता एसटीतून प्रवास, वैशाली येडेंचा प्रचार

यवतमाळ: आपल्या भाषणाने मराठी साहित्य संमेलन गाजविणाऱ्या वैशाली येडे यांनी काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी आज एसटी बसमधून प्रवास करत प्रचार केला. वैशाली येडे या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे […]

आधी रक्तदान करुन अर्ज भरला, आता एसटीतून प्रवास, वैशाली येडेंचा प्रचार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

यवतमाळ: आपल्या भाषणाने मराठी साहित्य संमेलन गाजविणाऱ्या वैशाली येडे यांनी काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी आज एसटी बसमधून प्रवास करत प्रचार केला. वैशाली येडे या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात वेगळेच वातावरण निर्माण झालं आहे. वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज 25 मार्च रोजी भरण्यात आला. त्यावेळी  प्रहार संघटेनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तादान करुन अनोखा उपक्रम राबवला.

त्यानंतर आज वैशाली येडे यांनी त्यांच्या कळंब तालुक्यातील राजुल गावातून एसटी बसने यवतमाळपर्यंत प्रवास केला. एसटी प्रवासादरम्यान त्यांनी सहप्रवाशांकडे मतरुपी पाठिंबा मागितला. सुमारे 35 किमीचा प्रवास त्यांनी एसटीने केला.

वैशाली येडे आज आपल्या गाववरुन यवतमाळला उमेदवारी अर्ज छाननी आणि चिन्ह वाटपसाठी आल्या होत्या. त्या एकट्या बसने प्रवास करत होत्या.

हल्ली आलिशान मोठ्या गाडीशिवाय कार्यकर्ते सुद्धा प्रचार करत नाहीत. मात्र वैशाली येडे यांनी अशा पद्धतीने केलेला बसप्रवास चर्चेचा विषय बनला आहे. वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी प्रहार संघटनेकडून झोळी फिरवून लोकवर्गणी गोळा केली जात आहे. आज त्यांच्या या बस प्रवासामुळे त्या आणखी चर्चेत आल्या आहेत.

यवतमाळमधील उमेदवारांची संपत्ती

प्रहार उमेदवार – वैशाली येडे

यांच्याकडे 5 ग्रॅम सोने असून, त्याची किंमत 15 हजार आहे

3.5 एकर शेती आहे

जंगम मालमत्ता: 1 लाख 18 हजार 500

स्थावर: 1 लाख 05 हजार

शिवसेना उमेदवार – भावना गवळी

यांच्याकडे रोख 24 लाख 70 हजार 780 रक्कम आहे

हुंडाई क्रेटा, इन्होवा हुंडाई वेर्ना अशा तीन गाड्या आहेत

सोने 200 ग्रॅम तर चांदी 1200 ग्रॅम आहे

एकूण स्थूल मूल्य 1 कोटी 57 लाख 15 हजार 275 असे असून

स्थावर मालमत्ता 8 कोटी 11 लाख 57 हजार 914 एवढी आहे.

काँग्रेस – माणिकराव ठाकरे

वाहन : इनोव्हा ,क्रेटा

रोख रक्कम

स्वतः माणिकराव -16 लाख 59 हजार 799

पत्नी : 9 लाख 62 हजार 725

स्थावर मालमत्ता 1290750

जंगम मालमत्ता 9000000

पत्नी 7200000

परसराम आडे – अपक्ष उमेदवार

रोख 68029

पत्नी 5189772

वाहन : इनोव्हा ,सेलेरिओ

सोने 298 ग्रॅम

पत्नी 373 ग्रॅम

स्थूल मालमत्ता

स्वतः : 2982858

पत्नी 7025335

स्थावर मालमत्ता

177293576

संबंधित बातम्या

साहित्य संमेलनात भाषण गाजवणाऱ्या वैशाली येडे निवडणुकीच्या रिंगणात  

सणसणीत भाषणानंतर उद्धव ठाकरेंचा थेट फोन, वैशाली येडेंचे 5 प्रश्न 

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली