शेतकऱ्यांचा अपमान करणारे दानवे येडपट, भैताड; वडेट्टीवारांचा तोल सुटला

| Updated on: Dec 12, 2020 | 12:17 PM

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा तोल सुटला. (vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

शेतकऱ्यांचा अपमान करणारे दानवे येडपट, भैताड; वडेट्टीवारांचा तोल सुटला
Follow us on

नागपूर: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा तोल सुटला. शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. (vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांचा अपमान करणारे रावसाहेब दानवे येडपट आणि भैताड आहेत. हे भैताड राजकारणात कसं आलं माहीत नाही. कार्टुन जसे वागतात तसेच हे वागत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी दानवेंवर केली. बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे दानवेंच्या कमरेत डावा किंवा उजवा घातला पाहिजे. त्यांच्या कमरेत हाणायला पाहिजे, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं.

मग चर्चा तरी कशाला करता?

शेतकऱ्यांचा अनादर करणाऱ्या व्यक्तीला भाजपमध्ये मंत्री केलं जातं. त्यामुळे भाजपची किव येते. भाजपला काहीस कसं वाटत नाही. त्यांना लाज वाटत नाही का? असा सवाल करतानाच केंद्रीय गृहमंत्री शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. मग शेतकरी जर पाक आणि चीनचे असतील तर त्यांच्याशी चर्चा तरी कशाला करता? असा सवालही त्यांनी केला. (vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

दानवे काय म्हणाले होते?

राजधानी दिल्लीत पंजाब, हरियाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते या आंदोलनावर टीका करताना दिसत आहे. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.

‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला होता. त्यावर गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी टीका केली होती. रावसाहेब दानवे हे एक ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणं चुकीचे आहे. शेतकऱ्यांबद्दल सर्व देशभरात सहानुभूतीचे वातावरण आहे, असे असताना दानवे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य कोणत्या पुराव्याच्या आधारे केलं हे त्यांनी स्पष्ट करावं. जर त्यांच्याकडे असे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत आणि स्वतःच्या वक्तव्यावर ठाम राहावं, असं पाटील म्हणाले होते. (vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)

 

संबंधित बातम्या:

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल; बच्चू कडू यांची घणाघाती टीका

सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत; तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी : अतुल भातखळकर

“मतदारांनी भाजपला जागा दाखवली, कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित”

(vijay wadettiwar slams raosaheb danve over farmer remarks)