AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर? केंद्र की राज्य सरकार, कोण तोफेच्या तोंडावर..

Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर अधिक असतो, केंद्र सरकार की राज्य सरकारवर..

Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर? केंद्र की राज्य सरकार, कोण तोफेच्या तोंडावर..
मतदारांचा रोष कोणावर?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 18, 2022 | 9:51 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय संघराज्याच्या (Union of India) रचनेत केंद्र आणि राज्य सरकारचे (State Government) स्थान अतिमहत्वाचे आहे. पण सध्याचे राजकारण, महागाई, समस्या पाहता सर्वाधिक रोष कोणावर दिसून येतो? केंद्र सरकारवर (Central Government) रोष निघतो की राज्य सरकारवर मतदार रोष काढतो? या प्रश्नाची उत्तरे एका सर्व्हेतून समोर आली आहेत..काय सांगतो आहे हा सर्व्हे..

2014 पासून देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पक्षनिहाय संबंध ताणल्या गेल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर असल्यास हे संबंध ताणल्या जात नाहीत. परंतु, केंद्राच्या विरोधातील पक्षांचे सरकार राज्यात सत्तेवर असल्यास हा वाद उफाळतो.

सध्या देशातील राजकारण सरळसरळ भाजप आणि भाजपविरोधी पक्षात विभागल्या गेले आहे. 2014 नंतर हे ध्रुवीकरण झाले. 2019 नंतर मात्र हा वाद मोठ्या प्रमाणात समोर आला. अनेक राज्यात सरकार उलथवण्याचे प्रकार घडले आणि भाजपविरोधातही जोरदार हल्लाबोल वाढला आहे. मतदारांना ही गोष्ट स्पष्टपणे दिसत आहे.

IANS आणि C Voter ओपिनियन पोलद्वारे एक सर्व्हेक्षण झाले. त्यात केंद्र सरकार की राज्य सरकार यापैकी त्यांचा रोष नेमका कोणावर आहे, याचा उलटतपास करण्यात आला. मतदारांचा सर्वाधिक रोष नेमका कोणावर जास्त निघतो, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या सर्व्हेनुसार, 46.6 टक्के मतदार हे त्यांच्या राज्य सरकारवर नाराज आहेत. तर 34.8 मतदार हे केंद्र सरकारवर नाराज असल्याचे समोर आले आहे. या सर्व्हेनुसार, 24.6 टक्के मतदार त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर तर 17.9 मतदार पंतप्रधानांवर नाराज आहेत. राज्य सरकारपेक्षा केंद्राची धोरणे आणि नीतींवर लोक अधिक नाराज आहेत.

कोविड काळात राज्य सरकारांनी केंद्र सरकारच्या एककल्ली धोरणांवर जाहीर टीका केली होती. तसेच केंद्र सरकार अनेक मुद्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप राज्यांनी केला होता. त्यानंतर केंद्रापेक्षा आता राज्यांवर मतदार नाराज असल्याचा दावा या सर्व्हेक्षणात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ