AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील या तीन जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला

मुंबई : एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपला राज्यात 36 ते 40 जागा मिळताना दिसत आहेत. अंतिम निकालामध्ये चित्र स्पष्ट होईलच, पण राज्यातील काही जागा अशा आहेत, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला लागलंय. जर इथे पराभव झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा तो पराभव असेल. महाराष्ट्रातील तीन जागा हायप्रोफाईल लढती आहेतच, शिवाय राज्यातील पुढील […]

महाराष्ट्रातील या तीन जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला
| Edited By: | Updated on: May 23, 2019 | 7:56 AM
Share

मुंबई : एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपला राज्यात 36 ते 40 जागा मिळताना दिसत आहेत. अंतिम निकालामध्ये चित्र स्पष्ट होईलच, पण राज्यातील काही जागा अशा आहेत, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला लागलंय. जर इथे पराभव झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा तो पराभव असेल. महाराष्ट्रातील तीन जागा हायप्रोफाईल लढती आहेतच, शिवाय राज्यातील पुढील राजकारणाची दिशाही ठरवणार आहेत.

बारामती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत भाजपने 2014 मध्ये पहिल्यांदाच आव्हान उभं केलं. यावेळीची कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपने खेळी खेळली. राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी गावागावात जाऊन प्रचार केला. भाजपनेही पूर्ण ताकद पणाला लावली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे बारामतीत तळ ठोकून होते. बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. तिसऱ्या टर्मसाठी बारामतीतही धाकधूक वाढली आहे.

Lok Sabha Results 2019 LIVE : महाराष्ट्रातील निकालाचे अपडेट्स

मावळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक रिंगणात उतरवलंय. अजित पवारांनी या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मावळ मतदारसंघात रायगडमधील उरण, कर्जत आणि पनवेल हे किंमगमेकर विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे पार्थ पवारांची मदार ही रायगड जिल्ह्यातील मतदारसंघावर असेल. कारण, मावळ भागात भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे. यावेळी पवार कुटुंबाचा पराभव करणारच असा पण शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केलाय.

Lok sabha Results 2019 : देशभरातील निकालाचे अपडेट्स

नांदेड

महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा असलेले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही धाकधूक वाढली आहे. कारण, भाजपने नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलंय. अशोक चव्हाणांना प्रचारासाठी जिल्ह्याच्या बाहेरही जाता आलं नव्हतं. अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये रोखून धरण्यात तर भाजपने यश मिळवलं, पण निकाल काय असेल ते लवकरच स्पष्ट होईल. भाजपकडून इथे प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात ‘या’ 4 मतदारसंघांचा निकाल सर्वात अगोदर लागण्याची शक्यता

आम्हालाही 272 चा आकडा गाठण्याची संधी द्यावी, विरोधक राष्ट्रपतींना विनंती करणार

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.