AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे येत आहेत…’अदानी’विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या?; ‘ही’ मागणी महत्त्वाची

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्यात आला आहे. पण अदानी समूहाकडून या पुनर्विकासाचा कोणताही मास्टर प्लान देण्यात आलेला नाही. त्याच्याविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धारावीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल 300 पोलीस या मोर्चासाठी तैनात राहणार आहेत.

ठाकरे येत आहेत...'अदानी'विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या?; 'ही' मागणी महत्त्वाची
Uddhav Thackeray Gautam Adani
| Updated on: Dec 16, 2023 | 6:38 PM
Share

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा आज अदानी उद्योग समूहाविरोधात जोरदार मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्वत: उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धारावीत प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच या मोर्चाच्या निमित्ताने मुंबईतही होर्डिंग्ज लागले आहेत. संपूर्ण मुंबईतून लोक या मोर्चाला येणार आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शक्तीप्रदर्शन करत आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या भारत नगर येथील अदानी बिल्डिंगला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. अदानी बिल्डिंगकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अदानी ग्रुपच्या इमारती, कार्यालय समोरील सर्व रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यावरही प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस व्हॅनही लावण्यात आल्या आहेत.

UBT Dharavi MahaMorcha ground report | धारावीतील अदानी यांच्या प्रकल्पावर रहिवासी का नाराज आहेत ? काय आहेत मागण्या ? येथे पाहा व्हिडीओ –

300 पोलिसांचा बंदोबस्त

धारावी ते बीकेसीपर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 30 वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या 4 ते 5 तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र गृह रक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आदी 300 च्यावर पोलिसांचा या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धारावी ते बीकेसी मैदानापर्यंत हा पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्तही या मोर्चावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

सर्वात महत्त्वाची मागणी

या मोर्चात एकूण सात मागण्या करण्यात आल्या आहेत. धारावीकरांच्या पुनर्वसनाची मागणी महत्त्वाची आहेच. पण त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी टीडीआरशी संबंधित आहे. टीडीआर देण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अदानी समूहाकडे टीडीआरची मक्तेदारी राहू नये यासाठी ही मागणी करण्यात आल्याने सरकारची आणि अदानी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मागण्या काय?

धारावीतील सर्व निवासी, अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा

निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचे घर मोफत द्या

‘टीडीआर’साठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी

पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचे घर मोफत द्या

झोपडपट्टीत अनेकांचे व्यवसाय चालतात त्यांचे पुनर्वसन करा

नव्याने सर्वेक्षण करा, निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करा

प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लान आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.