AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : आरोप-प्रत्यारोपानंतर रोहित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भेटीमागचे कारण काय?

छत्रपती शिवराय आणि देशभराचील ऐतिहासिक गोष्टी ह्या भारताच्या बाहेर आहेत. त्या परत महाराष्ट्रामध्ये कशा आणता येतील यावर चर्चा झाली. शिवाय हा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील महत्वाचा वाटल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेड विभानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघातील विकास कामाबाबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Rohit Pawar : आरोप-प्रत्यारोपानंतर रोहित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भेटीमागचे कारण काय?
रोहित पवार, आमदारImage Credit source: Google
| Updated on: Aug 29, 2022 | 4:42 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे (Rohit Pawar) आमदार रोहीत पवार हे मतदारसंघातील कामानिमित्त आणि विविध योजना राबवण्याबाबत (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. यापूर्वीही त्यांनी अशा भेटी घेऊन मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. शिवाय या भेटीत त्यांनी परदेशात असलेल्या आपल्या राज्यातील (Historical structures) ऐतिहासिक वास्तू परत आणव्यात याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या भेटीमागे वेगळेच कारण असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचे मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करणाऱ्या ट्विटची मालिकाच सुरु केली होते. यावर पवार यांनी स्पष्टीकरणही दिले. असे असताना त्यांनी लागलीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भेटीमागचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

छत्रपती शिवराय आणि देशभराचील ऐतिहासिक गोष्टी ह्या भारताच्या बाहेर आहेत. त्या परत महाराष्ट्रामध्ये कशा आणता येतील यावर चर्चा झाली. शिवाय हा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील महत्वाचा वाटल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेड विभानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघातील विकास कामाबाबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे. अन्य कोणत्याही बाबींवर चर्चा झाली नाही, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

मोहित कंबोजचे काय आहेत आरोप?

ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे 200 व्यवसाय उभारण्यात आले आहेत.या स्टार्टअप्ससाठी 2007 ते 2012 या कालावधीत घेण्यात आलेल्या कर्जातून बॅंकेचे 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही या बॅंकेने एका गबरुला करोडो रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता ट्विट केले होते. या पैशावर 50 कोटी रूपयांना कारखाना कार्टेल बनवत बारामती ॲग्रोने विकत घेतला आहे. तर याच कारखान्यावर पुन्हा 150 कोटींचे कर्ज घेतले गेल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. सबंध ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी गबरु जवान असाच उल्लेख केला आहे.

संस्थाकडून ना चौकशी ना नोटीस

मोहित कंबोज यांच्याकडून करण्यात आलेले आरोपांमध्ये तथ्य नाही. तो केवळ प्रसिध्दीसाठी केलेला कारभार आहे. शिवाय आपल्याला कोणत्याही संस्थेची नोटीस आलेली नाही किंवा चौकशीलाही बोलावलेले नाही. भविष्यात चौकशीला बोलावणे आलेच तर त्यांना आपण सहकार्य करणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले होते. या स्पष्टीकरकणानंतर लागलीच आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.