AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजीनामा देण्यास तयार, पण चौकशीनंतरच तो मंजूर करा’, राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती?

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांच्या राजीनामा घेतल्यास शिवसेनेवर काय परिणाम होऊ शकतात? बंजारा समाजाची भावना किंवा दबाव संजय राठोड यांना वाचवणार का? अशा प्रश्नांवरही सध्या चर्चा सुरु आहे.

'राजीनामा देण्यास तयार, पण चौकशीनंतरच तो मंजूर करा', राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती?
उद्धव ठाकरे-संजय राठोड
| Updated on: Feb 28, 2021 | 3:08 PM
Share

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, शिवसेनेचे अन्य नेते आणि संजय राठोड यांच्याच चर्चा झाली. पण संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांच्या राजीनामा घेतल्यास शिवसेनेवर काय परिणाम होऊ शकतात? बंजारा समाजाची भावना किंवा दबाव संजय राठोड यांना वाचवणार का? अशा प्रश्नांवरही सध्या चर्चा सुरु आहे.(What will happen to Shiv Sena if Sanjay Rathod resigns?)

‘राजीनामा देण्यास तयार, पण…’

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्यास तयार आहेत. ते राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आहेत. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे आता याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय राठोड यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळत आहे. संजय राठोड यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबत ही चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राठोडांच्या राजीनाम्याचा शिवसेनेवर काय परिणाम होऊ शकतो?

संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर विदर्भात शिवसेनेला मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. कारण, ज्या बंजारा समाजाचं नेतृत्व संजय राठोड करत आहेत त्या बंजारा समाजाची संख्या जवळपास 2 कोटीच्या आसपास आहे. अशावेळी पोहरादेवी गडाच्या महंतांनीही संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी भूमिका मांडली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेल्यास फक्त राठोड नाही तर संपूर्ण बंजारा समाज दोषी ठरला जाईल. त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर राज्यात होणाऱ्या उद्रेकाला भारतीय जनता पार्टी जबाबदार राहील, अशी आक्रमक भूमिका महंत सुनील महाराज यांनी मांडली आहे. अशावेळी बंजारा समाजाची नाराजी ओढावून घेणं शिवसेनेला परवडणारं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेतही दोन गट पडल्याचं बोललं जात आहे. एक गट संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशा भूमिकेत आहे. कारण, पूजा चव्हाण प्रकरणात ठाकरे सरकारसह शिवसेनेची मोठी बदनामी होत आहे. सरकारची अब्रू वाचवण्यासाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जावा, अशी भूमिका एका गटाची आहे. तर दुसरा गट मात्र राठो यांचा राजीनामा आताच घेऊ नये, अशा मताचा आहे. कारण, बंजारा समाजाची नाराजी ओढावून घेणं शिवसेनेला जड जाऊ शकतं. विदर्भात शिवसेनेला याचा परिणाम भोगावा लागेल. त्यामुळे राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ नये, अशी भूमिका दुसऱ्या गटाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांचा राजीनामा घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना आता मुख्यमंत्री राठोड यांच्याबाबत वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतील असंही बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास वनमंत्री कोण?

संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, मोठ्या निर्णय होणार?

What will happen to Shiv Sena if Sanjay Rathod resigns?

Follow Us
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.