AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेची बुलंद तोफ कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

भाजप-शिनसेनेचा प्रत्येक मंत्री काम करतो. आमचे सर्व मंत्री व्यवस्थित काम करतात. तेच तुम्हाला न्याय देतील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

शिवसेनेची बुलंद तोफ कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
एकनाथ शिंदेंचे डुप्लीकेट विजय मानेंची हायकोर्टात धावImage Credit source: social media
| Updated on: Sep 20, 2022 | 6:50 PM
Share

अनिल केऱ्हाळे

जळगाव : मुख्यमंत्री (Chief Minister ) एकनाथ शिंदे आज जळगावात होते. यावेळी सभेत बोलताना शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील यांना पाणी खातं दिलं. 22 हजार योजना मंजूर करण्याचा इतिहास गुलाबरावांनी केला. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शिवसेनेची तोफ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जळगाव येथील सभेत सांगितलं. ते म्हणाले, मी गुलाबरावांचा चाहता आहे. मी त्यांचं भाषण ऐकायला उत्सुक असतो. शिवाजी पार्कवर भाषण द्यायचे तेव्हा ते लोकांमध्ये चैतन्य निर्माण करायचे. पण, त्यांचं भाषण बंद करण्यात आलं होते. एकनाथ शिंदे अशा कोत्या मनाचा कार्यकर्ता नाही. कार्यकर्त्यांना मोठा करणारा नेता असल्याचं ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पाळधी शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते.

शिंदे गटाच्या 50 लोकांची दखल पूर्ण जगानं घेतल्याचं मुख्यमंत्री सभेत बोलताना म्हणाले.भाजप-शिनसेनेचा प्रत्येक मंत्री काम करतो. आमचे सर्व मंत्री व्यवस्थित काम करतात. तेच तुम्हाला न्याय देतील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढं नेतोय. हैदराबादला गेलो होतो. तेव्हा लोकं आमच्यासोबत होते. आम्ही 50 लोकांनी उचलेलं पाऊल हे दखलपात्र घटना होती.

बाळासाहेबांचे विचार पुढं न्यायचे आहेत. म्हणून आम्ही धाडसानं हे पाऊल उचललं. बाळासाहेबांची इच्छा होती की, कश्मिरमधील 370 कलम हटवा. ही बाळासाहेबांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमित शहा यांनी पूर्ण केली.

राममंदिर बांधण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. राममंदिर बांधण्याचं काम सुरू आहे. मग आम्ही भाजपसोबत गेलोत. तर काय झालं, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.

असंघाशी संघ केला तेव्हा काही वाटलं नाही का, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.