AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेरे! पोस्ट व्हायरल झालीये खरी पण सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या भावनांचं काय?

याशिवाय काही लोक वर्तमानपत्रात याबाबत जाहिरातीही देतात. अशीच एक मॅट्रिमोनियल जाहिरात आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर लोक खूप एन्जॉय करतायत.

अरेरे! पोस्ट व्हायरल झालीये खरी पण सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या भावनांचं काय?
Marriage Advertisement ViralImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 20, 2022 | 6:22 PM
Share

आज जगाने खूप हालचाल केली, प्रगती केली असली तरी भारतात आजही अरेंज मॅरेज मोठ्या प्रमाणावर आहेत. मुला-मुलीच्या कुटुंबीयांना आपल्या मुलांसाठी चांगला वर किंवा वधू शोधायची असते. तसेच अनेक वेळा नातेवाईकही या कामात गुंतून जातात आणि त्यांना योग्य वधू किंवा वर शोधण्यात मदत करतात. तसं पाहिलं तर आजकाल मुलगा किंवा मुलगी शोधण्याचं कामही ऑनलाइन केलं जातंय. याशिवाय काही लोक वर्तमानपत्रात याबाबत जाहिरातीही देतात. अशीच एक मॅट्रिमोनियल जाहिरात आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर लोक खूप एन्जॉय करतायत.

एक काळ असा होता की, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स लग्नाच्या बाबतीत मुलींची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची पहिली पसंती असायची, कारण त्यांची कमाई तर चांगली होतेच, शिवाय त्यांना परदेशात जाण्याचीही चांगली संधी होती.

पण आज वर्तमानपत्रात दिलेली ही वैवाहिक जाहिरात पाहिली तर काळ बदलल्याचं जाणवतं. सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची मागणी आता पूर्वीइतकी राहिलेली नाही. हे वाचून सॉफ्टवेअर इंजिनीअरची काय हालत झाली असेल देव जाणे.

जाहिरात पहा

खरं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर समीर अरोरा नावाच्या युझरने या मॅट्रिमोनियल जाहिरातीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात लिहिलं आहे की, बिझनेस बॅकग्राऊंडमधून असलेली एमबीए केलेली एक सुंदर मुलगी, वर शोधतेय. मुलगा आयएएस/आयपीएस, वर्किंग डॉक्टर (पीजी) किंवा त्याच जातीचा उद्योगपती/बिझनेसमन असावा.”

“सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना विनंती आहे की, कृपया फोन करू नका”. याचा अर्थ मुलीला सॉफ्टवेअर इंजिनीअर वर अजिबात नको असतो, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

ही मॅट्रिमोनियल जाहिरात ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर लोकही खूप एन्जॉय करत आहेत. एका युझरने कमेंट केली की, ‘आम्ही इंजिनिअर्स इतके वाईट आहोत का’, तर दुसऱ्या युझरने लिहिले, ‘आयटीशिवाय भविष्य चांगले असूच शकत नाही’.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.