AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा महागला म्हणून मोदीजी कांदे उगवतील का? : बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथल्या गीता महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांना सल्ला देताना रामदेव बाबांनी (Ramdev Baba onion price) विविध विषयांवर भाष्य केलं. 

कांदा महागला म्हणून मोदीजी कांदे उगवतील का? : बाबा रामदेव
| Updated on: Dec 09, 2019 | 12:19 PM
Share

अहमदनगर : योगगुरु बाबा रामदेव यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथल्या गीता महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांना सल्ला देताना रामदेव बाबांनी (Ramdev Baba onion price) विविध विषयांवर भाष्य केलं.  “देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई वाढत आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. देशात अनेक आव्हाने आहेत. हे सर्व ठीक आहे, पण तुम्ही काय करताय? असा सवाल विचारत, आपण सर्वांनी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे”, असा सल्ला रामदेवबाबांनी (Ramdev Baba onion price) विद्यार्थ्यांना दिला.

रामदेव बाबा म्हणाले, “आपण समस्या मोजत बसण्यापेक्षा या समस्येचं निराकरण कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, तसा संकल्प करा. एकटे मोदी काय करतील? कांद्याचे दर वाढले म्हणून मोदी काय कांदा उगावतील का? दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वत: कीर्तिमान बना”

मोदी कांदे उगवतील का?

“काही मुलं अभ्यासावेळी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, काही लोक कामावेळी कामाकडे दुर्लक्ष करतात. मग म्हणतात बेरोजगारी वाढतेय. देशात बेरोजगारी वाढतेय, महागाई वाढतेय, गरिबी वाढतेय, देशाची अर्थव्यवस्था डगमगली आहे. देशात अनेक आव्हानं आहेत असा पाढा वाचतात. ते सर्व ठिक आहे, पण तू काय करतो आहेस? आपण समस्या मोजणारे बनू नये, आपण आयुष्यात असं काही करावं, की सर्व समस्यांचं निराकरण करुन, नवा कीर्तिमान उभा करावा, असा संकल्प मुलांनी करावा. अन्यथा लोक मोदींना दोष देत बसतील. मोदीजी रोजगार द्या, मोदीजी आमच्या शेतीमालाला भाव द्या, मोदीजी महगाई हटवा, कांद्याचे दर वाढले आहेत, मग आता मोदीजी कांदे उगवतील का? तर गोष्ट ही आहे की आपल्या स्वत:ला मोठं काम करावं लागेल. आम्ही केवळ दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. दुसऱ्यांवर अवलंबून असतात ते दरिद्री, कंगाल असतात. आपल्या कर्माने, पुरुषार्थाने आपलं आणि इतरांचं भाग्य घडवणारे आपल्याला बनायचं आहे”, असा सल्ला रामदेव बाबांनी मुलांना दिला.

संगमनेर येथे बाबा रामदेव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत गीता परिवाराच्यावतीने गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 30 हजार विद्यार्थ्यांनी भगवतगीतेच्या 12 ते 15 व्या अध्यायांचे सामूहिक पठण केले.

बाबा रामदेव आणि मोहन भागवतांनी या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भव्य प्रमाणात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बाबा रामदेव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली.

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.