AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lockdown | लॉकडाऊन संपल्यावर राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम : पुणे जिल्हाधिकारी

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसते. सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

Pune Lockdown | लॉकडाऊन संपल्यावर राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम : पुणे जिल्हाधिकारी
Pune Lockdown
| Updated on: Jul 23, 2020 | 5:38 PM
Share

पुणे : पुण्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा आज (23 जुलै) अखेरचा दिवस आहे. मात्र लॉकडाऊन संपत असला तरी गर्दी नियंत्रणासाठी विशेषतः शनिवार-रविवारबाबत प्रतिबंध लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे. नवीन नियमावलीबद्दल पालिका आयुक्त घोषणा करतील. (Pune post lockdown rules and guidelines to be released)

राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम आहेत. त्या निर्देशांनुसार उद्यापासून परिस्थिती कायम राहील. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी असलेले P1 P2 चे नियम दुकानांना लागू राहतील, कोणताही वेगळा आदेश काढला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुण्यातील दहा दिवसांचा लॉकडाऊन गुरुवारी मध्यरात्री संपणार आहे. नियमितपणे ठरवून दिलेल्या वेळेत शुक्रवारपासून व्यवहार सुरु राहतील. परंतु आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसते. बाजारपेठ आणि लग्न समारंभातही गर्दी होते, सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ आज याच संदर्भात महापालिका आयुक्तांना भेटणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर नेमके काय काय प्रतिबंध असतील, यावर सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुण्यात शुक्रवारपासून नवीन काय नियमावली असेल, याबाबत पालिका आयुक्त घोषणा करतील.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पुणे व्यापारी महासंघाने वेळ वाढवून देण्याची मागणी यापूर्वी केली होती. त्याचबरोबर सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यासही विरोध केला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पुण्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात 19 तारखेपासून शिथिलता देण्यात आली होती.

दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत खरेदीसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परंतु इतक्या दिवसांनी आलेली शिथिलता आणि ‘गटारी’ याचा योग जुळल्याने पुणेकरांनी मोठी झुंबड केली होती.

लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसात पुण्यात तब्बल 14 हजार 109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, या दरम्यान पुण्यात 230 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे

पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे 63 हजार 351 कोरोना रुग्ण आहेत. तर 22 हजार 484 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत 1 हजार 514 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 799 बेफिकीर पुणेकरांवर कारवाई

पुण्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन, तरीही 14 हजार 109 नव्या रुग्णांची भर

(Pune post lockdown rules and guidelines to be released)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.