AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी  संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे (Sambhaji Brigade demand to file FIR against Sambhaji Bhide).

कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
| Updated on: Mar 31, 2020 | 5:52 PM
Share

पुणे : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी  संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे (Sambhaji Brigade demand to file FIR against Sambhaji Bhide). भिडे यांनी गाईच्या तुपाने भरलेलं बोट नाकात फिरवलं किंवा गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील, असा दावा केला होता. यावरच ब्रिगेड आक्षेप घेतला आहे. तसेच संभाजी भिडे यांच्या मेंदूला कोरोनाची लागण झाली आहे का याची तपासणी करा असं म्हणत बोचरी टीका केली.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबाबत एक निवेदन काढत आपली भूमिका स्पष्ट केली. या निवेदनात म्हटले संभाजी ब्रिगेडने म्हटले, “संभाजी भिडे कोरोना व्हायरसपेक्षा भयानक आहेत. त्यांच्या मेंदूला कोरोनाची लागण झाली आहे का हे सांगलीच्या पालकमंत्र्यांनी तपासून घ्यावे. कोरोनाग्रस्तांना बरं करण्यासाठी ‘गोमूत्र आणि तूप खावू घाला’ असं सांगून ते लोकांची फसवणूक करत आहेत. या प्रकरणी संभाजी भिडे या भोंदूविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी देखील संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “खरोखरच सरकारने भिडे गुरुजींसारख्या लोकांवर त्वरित कारवाई करावी. कारण कोरोना प्रतिबंध उपायांमध्ये या उपायांची गरज महत्वाची आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे.”

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

“गोमूत्र आणि गायीचं तूप हे अतितीव्र जंतुनाशक आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाधित रुगणांवर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा. गाईच्या तुपाने भरलेला बोट नाकात फिरविला किंवा गाईचे गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे होतील. त्यांच्या खाण्यापिण्यातसुद्धा गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा”, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला.

“इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करा. सांगलीच्या एकाच कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा”, अशी मागणी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

“चीन हा जगातील सर्वात नीच देश आहे. चीनवर पुढील पाच वर्ष सर्व जगाने बहिष्कार टाकला पाहिजे. चीन मेला काय, जगला काय बघू नये, चीनशी संबंध तोडावेत. चीनचा हलकटपणा जाईल अस मला वाटत नाही. चीनचा हलकटपणा जायचा असेल, तर चीनवर अत्यंत कठोर पावले उचलली पाहिजेत. चीनला सर्व जीवनावश्यक मार्गाने संपवले पाहिजे”, असंही संभाजी भिडे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020’ मधील तरतूद

महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020’ मधील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्ती/संस्था/संघटनांना कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती पसरवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत संबंधित सरकारी अधिकारी आणि विभागांकडून अधिकृत माहितीचं प्रसारण करण्यात येईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. याबाबतच्या कोणतीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था/संघटनांविरोधात कायदेशीर कारवाईचीही तरतूद करण्यात आलीआहे.

कोरोनापासून वाचवणाऱ्या गाद्यांच्या जाहिरातीवर पोलिसांची कारवाई

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भिवंडीतील एका गादी कंपनीने आमच्या गादी वापरल्यास तुम्ही कोरोनापासून बचावला जाल, असा दावा करण्यात आला होता. अरिहंत मॅट्रेस या गादी कंपनीने वर्तमान पत्रात जाहिरात देऊन 15 हजार रुपयात ‘अँटी-कोरोना व्हायरस गाद्या’ घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा अशी जाहिरात केली होती. यानंतर भिवंडीच्या पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे आता वैज्ञानिक आधार नसलेला कोरोनावरील उपाय सांगणाऱ्या संभाजी भिडेंवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर गुन्हा दाखल करा, संभाजी भिडेंची मागणी

गाईचे तूप नाकात टाका किंवा गोमूत्र प्यायला द्या; कोरोना बरा होईल : संभाजी भिडे

Sambhaji Brigade demand to file FIR against Sambhaji Bhide

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.