AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro tips : आर्थिक समस्यांचा करत असाल सामना तर अवश्य करा हे ज्योतिषीय उपाय

धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुळशीचे रोप आवडते. त्यामुळे रोज सकाळी उठून स्नान करून, तुळशीला जल अर्पण करून दिवा लावून पूजा केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

Astro tips : आर्थिक समस्यांचा करत असाल सामना तर अवश्य करा हे ज्योतिषीय उपाय
जोतिषशास्त्रImage Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Feb 09, 2024 | 7:35 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार असे म्हटले आहे की जर देवी लक्ष्मी कोणत्याही कारणाने तुमच्यावर कोपली तर तुमच्या जीवनात धनाची कमतरता निर्माण होते. पैशाच्या कमतरतेमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच लोकं नेहमी देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक संकट टाळण्यासाठी कोणते ज्योतिषीय उपाय (Astro Tips) केले पाहिजेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

या उपायांनी होतील आर्थिक तंगी दूर

जर तुम्हाला आर्थिक संकट टाळायचे असेल तर रोज सकाळी देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करा. घरातील पूजास्थानी देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लाल फुले अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही.

रामाचे आवडते भक्त हनुमानजींची पूजा केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. यासाठी पिंपळाच्या पानावर राम लिहून मंदिरात ठेवा. रामनामाचे पान हनुमानजींच्या पायाजवळ ठेवू नये हे लक्षात ठेवा.

आर्थिक संकट टाळण्यासाठी सकाळी उठून भक्तीभावाने कनकधारा पाठ केल्यास जीवनात प्रगती होईल आणि जीवनात यश मिळण्याची शक्यता आहे.

धार्मिक मान्यतांनुसार असे मानले जाते की देवी लक्ष्मीला घर आणि दरवाजाची स्वच्छता आवडते. आर्थिक संकट टाळण्यासाठी रोज सकाळी उठून मुख्य दरवाजा आणि घर स्वच्छ करा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, तसेच वास्तुशास्त्रानुसार ते शुभ मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुळशीचे रोप आवडते. त्यामुळे रोज सकाळी उठून स्नान करून, तुळशीला जल अर्पण करून दिवा लावून पूजा केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. नेहमी चिंता राहते. खूप प्रयत्न करुनही तुम्हाला पुरेसे पैसे मिळत नसतील, आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर अपराजिताच्या फुलाचा हा उपाय करा. यासाठी सोमवारी उपवास करुन शिवलिंगाची पूजा करुन अपराजिताची फुले अर्पण करा. यासोबतच रुद्राक्षाच्या मापाने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. त्यानंतर अपराजिताचे फूल उचलून धनाच्या ठिकाणी ठेवावे. तुमच्या आयुष्यात पैशाचा ओघ झपाट्याने वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.