AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : असा असतो तूळ राशीच्या लोकांचा स्वभाव, या कारणांमुळे असतात हे इतरांपेक्षा वेगळे

तुम्ही अभिमानी गोडबोल्या स्वभावाचे असून तुम्हाला नवनवीन ओळखी करून गप्पा मारायला खूप आवडतं.

Astrology : असा असतो तूळ राशीच्या लोकांचा स्वभाव, या कारणांमुळे असतात हे इतरांपेक्षा वेगळे
तुळImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 10, 2023 | 9:44 PM
Share

मुंबई : तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. या राशीवर वायु तत्वाचे वर्चस्व आहे. बुध, शुक्र आणि शनि या ग्रहांसाठी मित्र मानले जातात. तर सूर्य, मंगळ आणि गुरू हे त्याचे शत्रू आहेत. ज्योतिषशास्त्रात (Astrology) तूळ राशीच्या लोकांना व्यावहारिकदृष्ट्या खूप विशेष मानले गेले आहे. तूळ राशीचे लोकं हुशार, रणनीतीकार आणि संघटक असतात. अत्यंत अभिजाततेने गोष्टी कशा करायच्या हे त्यांना माहीत आहे. आज आपण तूळ राशीच्या लोकांच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि उणीवांबद्दल जाणून घेऊया.

तूळ राशीच्या लोकांचे वैशिष्ट्ये

तूळ राशीचे लोकं सामान्य उंचीचे असतात. त्याचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो. ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षण असते. त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहेत. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात. हे त्यांच्या श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. सामान्यतः कला, कायदा, राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोकं कार्यरत असतात. त्यांना प्रवास करणे, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविणे आवडते. त्यांच्या आयुष्यातील 36 ते 48 वर्षे खूप महत्त्वाची आहेत.

उणीवा आणि समस्या

तूळ राशीचे लोकं मूडी स्वभावाचे असतात. कधी कधी ते त्यांच्या आदर्शांमुळे हुकूमशहा बनतात. अनेकदा दिसण्याच्या बाबतीत खूप पैसा खर्च होतो. ते इतरांसाठी स्वतःचे नुकसान करतात. जीवनसाथी कठोर आणि उद्दाम स्वभावाचा असतो. उपासना आणि ध्यान या बाबतीत ते अनेकदा निष्काळजी असतात.

या उपायांनी मिळतो लाभ

तूळ राशीच्या लोकांनी उपासना किंवा ध्यानात दुर्लक्ष करू नये. या राशीच्या लोकांनी विचारपूर्वक आणि कुंडलीची सांगड घालून लग्न करावे. इतरांच्या कामात आपला पैसा आणि वेळ वाया घालवू नये. निळा नीलम घालणे फायद्याचे ठरेल. आठवड्यातून एकदा अन्नदान करा आणि लाल रंग टाळा.

जर तुमची राशी तूळ असेल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येने त्रस्त असाल तर सूर्याला नियमित पाणी अर्पण करा. रोज संध्याकाळी चंद्र मंत्राचा 108 वेळा जप करा. सल्ला घेतल्यानंतर निळा नीलम घाला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.