AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रागावर ठेवायचे असेल नियंत्रण तर अवश्य करा जोतिष्यशास्त्रातले हे उपाय

आजच्या बदलत्या काळात, धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे अनेकांच्या स्वभावात चिडचिडेपणा (anger) वाढत चालला आहे, शिवाय  आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं असतात ज्यांना गरजेपेक्षा जास्त राग येतो. अशा लोकांना राग येण्यासाठी कुठलेच मोठे कारण लागत नाही. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये सामील असाल तर त्याचा संबंध ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही पाहता येईल. ज्योतिषशास्त्रीय (anger) दृष्टीकोनातून पाहिले तर ते […]

रागावर ठेवायचे असेल नियंत्रण तर अवश्य करा जोतिष्यशास्त्रातले हे उपाय
| Updated on: Jun 21, 2022 | 7:04 PM
Share

आजच्या बदलत्या काळात, धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे अनेकांच्या स्वभावात चिडचिडेपणा (anger) वाढत चालला आहे, शिवाय  आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं असतात ज्यांना गरजेपेक्षा जास्त राग येतो. अशा लोकांना राग येण्यासाठी कुठलेच मोठे कारण लागत नाही. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये सामील असाल तर त्याचा संबंध ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही पाहता येईल. ज्योतिषशास्त्रीय (anger) दृष्टीकोनातून पाहिले तर ते ग्रह दोषांशी देखील संबंधित असू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार रागाचा संबंध फक्त वर्तन आणि मनाशी नसून राहू आणि मंगळ दोषामुळे व्यक्तीला अधिक राग येतो. तथापि, यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही ग्रहांचे वाईट प्रभाव कमी करून रागावर नियंत्रण मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल.

  1. चंदनाचा वापर

    ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर चंदनाचा वापर करा. चंदन केवळ तुमचे मन शांत ठेवत नाही तर त्याच्या वापराने राहू दोषापासूनसुद्धा आराम मिळतो.

  2. चांदीचा वापर ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्हाला बोलण्यातून राग आला तर रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांदीच्या अंगठीत किंवा पेंडेंटमध्ये मोठ्या आकाराचा खरा मोती घाला. चांदी मनाला शांत करते. तसेच, जर त्या व्यक्तीला चंद्रदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यावर योग्य नियंत्रण ठेवू शकाल.
  3. सूर्यदेवाची पूजा करा रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोज सकाळी स्नान वगैरे करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाचे ध्यान करावे.
  4. लाल रंग टाळा दैनंदिन जीवनात लाल रंगाचे कपडे कमी वापरा. लाल रंग हा ज्वलंत स्वभावाचे प्रतीक मानला जातो.  पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे घालणे योग्य राहील.
  5. हनुमान चालीसाचे पठण करा रोज हनुमान चालिसा वाचा, यामुळे शनी  शांत तर होतोच शिवाय रागही कमी होतो. याशिवाय घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पूर्व दिशेला दिवा लावा. या उपायाने राग कमी होतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.