AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजा रघुवंशीसाठी काळ बनला मंगल दोष! तुमच्या कुंडलीत तर नाही हे सावट? जाणून घ्या

इंदूरचे राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते. ते हनिमूनसाठी शिलाँगला गेले, जिथे राजाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आणि सोनमचा आता कुठे पत्ता लागला आहे. लोक बोलू लागले आहेत की, कुंडलीतील दोषामुळे देखील अशा गोष्टी घडतात.

राजा रघुवंशीसाठी काळ बनला मंगल दोष! तुमच्या कुंडलीत तर नाही हे सावट? जाणून घ्या
Raja RaghuvansiImage Credit source: Tv9 Network
Follow us
| Updated on: Jun 09, 2025 | 2:48 PM

हिंदू धर्मातील शास्त्रांमध्ये कुंडलीला विशेष महत्त्व दिले जाते. लग्नापूर्वी जन्म पत्रिका जुळवणं ही केवळ परंपरा नसून, जीवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. सनातन संस्कृतीत असा विश्वास आहे की, जर वर-वधूच्या कुंडली जुळल्या नाहीत, तर लग्नानंतर त्यांचं वैवाहिक जीवन समस्यांनी घेरलं जाऊ शकतं. नुकत्याच इंदूरमधील एका नवविवाहित जोडप्याच्या घटनेने या धारणेला आणखी बळकटी दिली आहे.

इंदूरचे राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते. ते हनिमूनसाठी शिलाँगला गेले, जिथे राजाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आणि सोनमचा आता कुठे पत्ता लागला आहे. लोक बोलू लागले आहेत की, कुंडलीतील दोषामुळे देखील अशा गोष्टी घडतात. त्यामागचे कारण काय आहे? चला जाणून घेऊया. या अहवालात मंगल दोषाचे दुष्परिणाम.

वाचा: सूर्याचे होणार राशी संक्रमण! ‘या’ लोकांच्या नशीबाचे दार उघडणार, प्रत्येक कामात मिळणार यश पलटणार

मंगल दोषामुळे होतात अनेक धोके

उज्जैनचे प्रख्यात ज्योतिष आचार्य रवी शुक्ला यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, जर एखाद्याच्या कुंडलीत मंगल ग्रह पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल, तर त्याला मंगल दोष म्हणतात. याचा वैवाहिक जीवनावर मोठा परिणाम होतो. मंगल दोषामुळे अनेक प्रकारच्या अडचणी येतात, जसे की- कौटुंबिक कलह, आर्थिक समस्या, आरोग्याशी संबंधित त्रास, अकाली मृत्यू यांसारखी भीती कायम राहते.

कोणत्या उपायांनी मंगल दोष शांत होतो?

ज्योतिषशास्त्रानुसार, दोषांची शांती होऊ शकते. पण ते पूर्णपणे नष्ट करणं कदाचित शक्य नसतं. ज्याप्रमाणे एखाद्या आजारी व्यक्तीला औषध दिलं तर याची खात्री देता येत नाही की समस्या पूर्णपणे संपली आहे. काही काळानंतर समस्या परत येऊ शकते. त्याचप्रमाणे दोषांचे उपाय केल्याने शांती मिळते, पण समस्या पूर्णपणे संपत नाही. मंगल दोष दूर करण्यासाठी उज्जैनमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे.

मंगलनाथ अंगारेश्वराचं विशेष महत्त्व

धार्मिक नगरी उज्जैनमधील मंगलनाथ मंदिरात भात पूजेचं विशेष महत्त्व आहे. हे स्थान मंगल ग्रहाचे जन्मस्थळ मानलं जातं. मंगल दोष निवारण आणि शुभ फल प्राप्तीसाठी दररोज शेकडो लोक येथे येतात आणि भात पूजा करतात. भात पूजेमध्ये तांदळाने भगवान मंगलाची पूजा केली जाते, ज्यामुळे कुंडलीतील मंगल ग्रहाच्या नकारात्मक प्रभावांना शांत करता येऊ शकतं.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.