AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalsarpa Dosh : मानसिक तनाव आणि आर्थिक हानीचा सतत येत असेल अनुभव तर पत्रिकेत असू शकतो कालसर्प दोष

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी पत्रिकेत काल सर्प दोष येतो, त्या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे त्यांनाच काल सर्प दोषामुळे होणाऱ्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो.

Kalsarpa Dosh : मानसिक तनाव आणि आर्थिक हानीचा सतत येत असेल अनुभव तर पत्रिकेत असू शकतो कालसर्प दोष
काल सर्प दोष
| Updated on: May 01, 2023 | 8:11 PM
Share

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या पत्रिकेत ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगामुळे काही शुभ आणि अशुभ योग बनतात. पत्रिकेत स्थित असलेल्या शुभ योगामुळे व्यक्तीला लाभ होत असतो, तर दुसरीकडे अशुभ योग आणि दोषामुळे जीवनात काही काळासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा अशुभ योगांपैकी एक म्हणजे काल सर्प दोष (Kalsarpa Dosh). हा दोष शापित मानला जातो. खरं तर, ज्योतिष शास्त्राच्या तज्ञांचे म्हणणे आहे की काल सर्प दोषाच्या अशुभ प्रभावामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार काल सर्प दोषाची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.

काल सर्प दोषाची लक्षणे काय आहेत?

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी पत्रिकेत काल सर्प दोष येतो, त्या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे त्यांनाच काल सर्प दोषामुळे होणाऱ्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो. यासोबतच काल सर्प दोषामुळे जातकांना मुलांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, जर एखादी व्यक्ती कमी वेळात वारंवार नोकरी बदलत असेल तर ते काल सर्प दोषाचे लक्षण आहे. याशिवाय एखाद्या वेगळ्या कामात स्थिरतेचा अभाव असेल, अशा स्थितीत ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ ते काल सर्प दोषाचे लक्षण मानतात.

काल सर्प दोष निवारण

कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपायही सांगितले आहेत. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने घरातील पूजेच्या ठिकाणी मोरपंख घातलेली श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र लावावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच त्यांची नियमित पूजा करावी. याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा जप देवाच्या पूजेदरम्यान किमान 108 वेळा करावा.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवार, मासिक शिवरात्री, महाशिवरात्री, त्रयोदशी इत्यादी दिवशी भगवान शिवाला रुद्राभिषेक करावा. यासोबतच मातीपासून महादेव बनवून त्यांची पूजा केल्याने काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार नागदेवतेची पूजा करूनही या दोषापासून मुक्ती मिळू शकते. अशा स्थितीत अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख आणि कुलिक यांची पूजा दर महिन्याच्या पाचव्या तिथीला करावी. नागदेवतेची पूजा करण्यापूर्वी महादेवाची पूजा करणे आवश्यक आहे.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे व्यक्तीने शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर तांबे किंवा चांदीचा नाग अर्पण करावा. असे केल्याने काल सर्प दोषापासूनही आराम मिळतो असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....