AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalsarpa Dosh : मानसिक तनाव आणि आर्थिक हानीचा सतत येत असेल अनुभव तर पत्रिकेत असू शकतो कालसर्प दोष

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी पत्रिकेत काल सर्प दोष येतो, त्या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे त्यांनाच काल सर्प दोषामुळे होणाऱ्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो.

Kalsarpa Dosh : मानसिक तनाव आणि आर्थिक हानीचा सतत येत असेल अनुभव तर पत्रिकेत असू शकतो कालसर्प दोष
काल सर्प दोष
| Updated on: May 01, 2023 | 8:11 PM
Share

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या पत्रिकेत ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगामुळे काही शुभ आणि अशुभ योग बनतात. पत्रिकेत स्थित असलेल्या शुभ योगामुळे व्यक्तीला लाभ होत असतो, तर दुसरीकडे अशुभ योग आणि दोषामुळे जीवनात काही काळासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा अशुभ योगांपैकी एक म्हणजे काल सर्प दोष (Kalsarpa Dosh). हा दोष शापित मानला जातो. खरं तर, ज्योतिष शास्त्राच्या तज्ञांचे म्हणणे आहे की काल सर्प दोषाच्या अशुभ प्रभावामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार काल सर्प दोषाची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.

काल सर्प दोषाची लक्षणे काय आहेत?

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी पत्रिकेत काल सर्प दोष येतो, त्या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे त्यांनाच काल सर्प दोषामुळे होणाऱ्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो. यासोबतच काल सर्प दोषामुळे जातकांना मुलांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, जर एखादी व्यक्ती कमी वेळात वारंवार नोकरी बदलत असेल तर ते काल सर्प दोषाचे लक्षण आहे. याशिवाय एखाद्या वेगळ्या कामात स्थिरतेचा अभाव असेल, अशा स्थितीत ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ ते काल सर्प दोषाचे लक्षण मानतात.

काल सर्प दोष निवारण

कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपायही सांगितले आहेत. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने घरातील पूजेच्या ठिकाणी मोरपंख घातलेली श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र लावावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच त्यांची नियमित पूजा करावी. याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा जप देवाच्या पूजेदरम्यान किमान 108 वेळा करावा.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवार, मासिक शिवरात्री, महाशिवरात्री, त्रयोदशी इत्यादी दिवशी भगवान शिवाला रुद्राभिषेक करावा. यासोबतच मातीपासून महादेव बनवून त्यांची पूजा केल्याने काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार नागदेवतेची पूजा करूनही या दोषापासून मुक्ती मिळू शकते. अशा स्थितीत अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख आणि कुलिक यांची पूजा दर महिन्याच्या पाचव्या तिथीला करावी. नागदेवतेची पूजा करण्यापूर्वी महादेवाची पूजा करणे आवश्यक आहे.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे व्यक्तीने शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर तांबे किंवा चांदीचा नाग अर्पण करावा. असे केल्याने काल सर्प दोषापासूनही आराम मिळतो असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.