AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalsarpa Dosh : मानसिक तनाव आणि आर्थिक हानीचा सतत येत असेल अनुभव तर पत्रिकेत असू शकतो कालसर्प दोष

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी पत्रिकेत काल सर्प दोष येतो, त्या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे त्यांनाच काल सर्प दोषामुळे होणाऱ्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो.

Kalsarpa Dosh : मानसिक तनाव आणि आर्थिक हानीचा सतत येत असेल अनुभव तर पत्रिकेत असू शकतो कालसर्प दोष
काल सर्प दोष
| Updated on: May 01, 2023 | 8:11 PM
Share

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या पत्रिकेत ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगामुळे काही शुभ आणि अशुभ योग बनतात. पत्रिकेत स्थित असलेल्या शुभ योगामुळे व्यक्तीला लाभ होत असतो, तर दुसरीकडे अशुभ योग आणि दोषामुळे जीवनात काही काळासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा अशुभ योगांपैकी एक म्हणजे काल सर्प दोष (Kalsarpa Dosh). हा दोष शापित मानला जातो. खरं तर, ज्योतिष शास्त्राच्या तज्ञांचे म्हणणे आहे की काल सर्प दोषाच्या अशुभ प्रभावामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार काल सर्प दोषाची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.

काल सर्प दोषाची लक्षणे काय आहेत?

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी पत्रिकेत काल सर्प दोष येतो, त्या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे त्यांनाच काल सर्प दोषामुळे होणाऱ्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो. यासोबतच काल सर्प दोषामुळे जातकांना मुलांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, जर एखादी व्यक्ती कमी वेळात वारंवार नोकरी बदलत असेल तर ते काल सर्प दोषाचे लक्षण आहे. याशिवाय एखाद्या वेगळ्या कामात स्थिरतेचा अभाव असेल, अशा स्थितीत ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ ते काल सर्प दोषाचे लक्षण मानतात.

काल सर्प दोष निवारण

कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपायही सांगितले आहेत. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने घरातील पूजेच्या ठिकाणी मोरपंख घातलेली श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र लावावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच त्यांची नियमित पूजा करावी. याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा जप देवाच्या पूजेदरम्यान किमान 108 वेळा करावा.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवार, मासिक शिवरात्री, महाशिवरात्री, त्रयोदशी इत्यादी दिवशी भगवान शिवाला रुद्राभिषेक करावा. यासोबतच मातीपासून महादेव बनवून त्यांची पूजा केल्याने काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार नागदेवतेची पूजा करूनही या दोषापासून मुक्ती मिळू शकते. अशा स्थितीत अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख आणि कुलिक यांची पूजा दर महिन्याच्या पाचव्या तिथीला करावी. नागदेवतेची पूजा करण्यापूर्वी महादेवाची पूजा करणे आवश्यक आहे.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे व्यक्तीने शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर तांबे किंवा चांदीचा नाग अर्पण करावा. असे केल्याने काल सर्प दोषापासूनही आराम मिळतो असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.