AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत आढळणारा कालसर्प दोष हा अत्यंत कष्टदायक योग असतो. राहू आणि केतूमुळे होणाऱ्या काल सर्प दोषाचा उल्लेख येताच लोक घाबरतात. कारण, या दोषामुळे जीवनात सर्व प्रकारच्या समस्या येतात. काल सर्प दोषामुळे चांगली कामे बिघडू लागतात. जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या दुष्कृत्यांचे कारण असलेल्या काल सर्प दोष दूर करण्याचा मार्ग जाणून घेऊया

Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा...
kaal sarp dosh
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 6:30 AM
Share

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत आढळणारा कालसर्प दोष हा अत्यंत कष्टदायक योग असतो. राहू आणि केतूमुळे होणाऱ्या काल सर्प दोषाचा उल्लेख येताच लोक घाबरतात. कारण, या दोषामुळे जीवनात सर्व प्रकारच्या समस्या येतात. काल सर्प दोषामुळे चांगली कामे बिघडू लागतात. जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या दुष्कृत्यांचे कारण असलेल्या काल सर्प दोष दूर करण्याचा मार्ग जाणून घेऊया –

? काल सर्प दोष टाळण्यासाठी श्रीगणेशाची उपासना अत्यंत फलदायी आहे. गणपती केतूच्या वेदना शांत करतो आणि देवी सरस्वती त्यांची पूजा करणाऱ्यांचे राहूपासून रक्षण करते.

? रोज भैरवाष्टक पठण केल्याने काल सर्प दोषाशी संबंधित त्रासातून मुक्ती मिळते.

? काल सर्प दोष दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा रोज 108 वेळा रुद्राक्ष जपमाळेने जप करावा. यासोबतच दशांश हवनही करावे.

? महाशिवरात्री, नागपंचमी, ग्रहण इत्यादी दिवशी शिवालयात नाग-नागिणीचा चांदीचा किंवा तांब्याचा जोडा अर्पण करावा.

? तुमच्या देवघरात मोर किंवा गरुड देवतेचा साप धरुन असलेला फोटो लावा आणि दररोज त्याचे दर्शन घ्या आणि नव नाग स्तोत्र – ”अनंत वासुकि शेष पद्मनाम च कंबल शंखपाल धार्तराष्ट्र कालिये तथा. एतानि नवनामानि नागानां च महात्माना सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः”, याचा जप करा.

? काल सर्प दोष टाळण्यासाठी, बुधवारी करंगळीमध्ये काल सर्प योगासाठी विशेष प्राणप्रतिष्ठित आणि अभिमंत्रित अंगठी घाला. त्यासोबतच त्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार राहूची सामग्री दान करा.

? काल सर्प दोष दूर करण्यासाठी प्रत्येक बुधवारी काळ्या कपड्यात मूठभर उडीद किंवा मूग ठेवा, राहू मंत्राचा जप करा आणि ते गरजूंना दान करा. जर कोणी गरजू आढळला नाही तर मूग वाहत्या पाण्यात सोडून द्या. 72 बुधवारी हा उपाय केल्यास चमत्कारी लाभ होतो.

? कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर तांब्याचा मोठा नाग बनवून अर्पण करा. यासोबतच नाग आणि नागिणचा चांदीचा जोडा बनवा. तांब्याच्या नागाची पूजा केल्यानंतर ब्रह्म मुहूर्तावर शिवालयात अर्पण करा आणि नाग-नागिणचा चांदीचा जोडा वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.

? कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी नागाची दगडी मूर्ती बनवून तिची पूजा शिवालयात करावी.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Aghan Maas 2021 | मार्गशीर्षाच्या पवित्र महिन्यात 5 गोष्टी नक्की करा, श्रीकृष्णाची खास कृपा होईल

मार्गशीर्ष महिन्यातील अंगारकी चतुर्थीला 6 उपाय करा, आयुष्यातील सर्व संकट दूर होतील

Follow Us
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी.
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील.
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.