मार्गशीर्ष महिन्यातील अंगारकी चतुर्थीला 6 उपाय करा, आयुष्यातील सर्व संकट दूर होतील

दर महिन्याला दोन चतुर्थी तिथी येतात, दोन्ही तिथी गजानन म्हणजेच गणपतीला समर्पित असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात.

मार्गशीर्ष महिन्यातील अंगारकी चतुर्थीला 6 उपाय करा, आयुष्यातील सर्व संकट दूर होतील
Ganesha
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 1:21 PM

मुंबई : दर महिन्याला दोन चतुर्थी तिथी येतात, दोन्ही तिथी गजानन म्हणजेच गणपतीला समर्पित असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात असे म्हणतात. जेव्हा संकष्टी चतुर्थीची तिथी मंगळवारी येते तेव्हा त्याला एकदंत संकष्टी चतुर्थी, अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणतात.

या मार्गशीर्ष महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी येत आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भक्ताचे सर्व त्रास दूर होतात. येथे जाणून घ्या अशाच काही उपायांबद्दल.

लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी

जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होऊ शकत नसेल, कोणत्याही प्रकारची विघ्न येत असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गूळ आणि २१ दुर्वा अर्पण करा आणि प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करा. यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होतील.

आर्थिक समस्या सोडवण्यासाठी

घरातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा. जर तूप गायीचे असेल तर ते अधिक चांगले आहे. या दिवशी गायीला गूळ खाऊ घाला. हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आणि पुढील वर्षी अनंत चतुर्दशीपर्यंत करा.

घरात शांततेसाठी

असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात, तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो. अशा वेळी घरात शांती आणि आनंद राखणे खूप महत्वाचे आहे. यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करा. हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे. या यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख-शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते.

व्यवसायात प्रगती

जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये जास्त दिवस पदोन्नती शक्य नसेल, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बाप्पाची मूर्ती घरी आणा, त्याची पूजा करा आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण करा. या दरम्यान ‘श्री गणााधिपतये नमः’ या मंत्राचा जप करावा.

कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी

तुमच्या कुटुंबावर काही संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. गणपती गजमुख आहे. असे केल्याने तो खूप प्रसन्न होतो आणि भक्ताचे सर्व संकट दूर करतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.