नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातातच ?
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या वीरांनी कसलाही विचार न करता उडी घेतली. स्वातंत्र्य मिळावं यासाठी मरण आले तरी चालेल अशा नेत्यांमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं नाव घेतलं जातं.
मुंबई – नेताजी सुभाषचंद्र बोस (NETAJI SUBHASHCHANDRA BOSE) यांचा मृत्यू तैवानमध्ये (TAIWAN) झाला, या दाव्याला बळकटी देणा-या काही कागदांचा संच एका वेबसाईटने (WEBSITE) प्रसिध्द केला होता. कारण नक्की मृत्यू विमानात झाला, की नाही याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली होती. ज्या वेबसाईटने ही माहिती जाहीर केली आहे, त्यामध्ये त्यांनी पाच साक्षीदारांच्या विधानाची नोंद सुध्दा आहे. विशेष म्हणजे पाच साक्षीदारांच्यामध्ये नेताची सुभाषचंद्र बोस यांच्या जवळच्या सहका-याचा समावेश आहे. ही घटना 18 ऑगस्ट 1945 रोजी घडली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला ओडिसा राज्यातील कटक शहरात झाला. त्यांचा वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होत. सुभाषचंद्र बोस यांचे वडील वकील होते. सुरूवातीला जानकीनाथ यांनी सरकारी वकील म्हणून काम केले. त्यानंतर सरकारचं धोरण लक्षात आल्यानंतर त्यांनी खासगी वकीली सुरू केली. ते बंगालचे विधानसभेचे सदस्य सुध्दा राहिलेले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचं 5 अपत्य होतं.
तरूणांना प्रेरीत करणारं काम
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या वीरांनी कसलाही विचार न करता उडी घेतली. स्वातंत्र्य मिळावं यासाठी मरण आले तरी चालेल अशा नेत्यांमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं नाव घेतलं जातं. काहीजण नेताजी सुभाष चंद्र बोस म्हणजे तळपता सुर्य होता असं म्हणतात. त्यांचे स्वातंत्र्याविषयी इतके चांगले विचार होते, की लोकं त्यांच्याशी पटकन जोडली जायची. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं काम आजही तरूणांना प्रेरीत करतं. अन्यायाच्या ठिकाणी तरूणांना संघर्ष करायला लावणार त्याचं काम होतं. स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचून त्यांनी त्यांना गुरू मानले होते.
असा झाला मृत्यू
18 ऑगस्ट 1945 रोजी अपघातात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांच्या जवळचा सहकारी एक, दोन जपानी डॉक्टर, एक दुभाषक, एक नर्स अशा लोकांनी साक्ष दिली आहे की , विमान अपघातात आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती www.bosefiles.info या वेबसाइट दिली आहे.
कर्नल हबिबुर रेहमान खान हे नेताजींचे अत्यंत जवळचे मित्र हे अपघात झाला त्यावेळी सोबत होते. या अपघातातून कर्नल हबिबुर रेहमान खान हे बचावल्यानंतर 24 ऑगस्ट 1945 रोजी लेखी साक्ष दिल्याचा पुरावा आहे.