AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोड शो, रॅलीवरील बंदी वाढवली! पण तरिही दिलासादायक कोणता निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय?

निवडणुकीसाठीचे रोड शो, आणि सर्व प्रकारच्या रॅलीवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बंदीमध्ये वाढ करतानाही निवडणूक आयोगानं महत्त्वपूर्ण दिलासा राजकीय पक्षांना दिला आहे.

रोड शो, रॅलीवरील बंदी वाढवली! पण तरिही दिलासादायक कोणता निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय?
निवडणूक आयुक्त सुशील चंद्र
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 7:20 PM
Share

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचा (5 State Assembly Election) प्रचार ऑनलाईनच करण्याचं आवाहन करताना निवडणूक आयोगानं (Election Commission) महत्त्वाचे निर्देश दिले होते. रोडशो, प्रचारसभा, रॅली यावर बंदी घालण्यात आली होती. अखेर ही बंदी उठणार की नाही, याबाबत आज निर्णय करण्यात येणार होता. याकडे पाचही राज्यांच्या राजकीय उमेदवारांचं लक्ष लागलं होतं. अखेर निर्णय समोर आला असून कोणत्याही राजकीय पक्षांना या निर्णयातून अल्पसा दिलासा मिळाला आहे. कारण निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना प्रचार ऑफलाईन करता येणार नव्हता. अनेकांना ऑनलाईन (Online) प्रचारावरच भर द्यावा लागला होता. दरम्यान, जे नियम निवडणूक आयोगानं घालून दिले आहेत, त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबत काही नियमांत अल्पसा बदल करण्यात आला आहे. आज पाच निवडणूक राज्यांचे आरोग्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार आता 31 जानेवारीपर्यंत ऑफलाईन प्रचारावर बंदीच असणार आहेत. मात्र अशातही काही अंशी दिलासादेखील देण्यात आला आहे.

बंदी कायम, प्रचारसभा कधी होणार?

निवडणुकीसाठीचे रोड शो, आणि सर्व प्रकारच्या रॅलीवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बंदीमध्ये वाढ करतानाही निवडणूक आयोगानं महत्त्वपूर्ण दिलासा राजकीय पक्षांना दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानं 28 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत प्रचारसभा घेण्यासाठी सूट दिली आहे. त्याचप्रमाणे दारोदारी जाऊन प्रचार करण्यासाठीही लोकांच्या सहभागाची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. डोअर टू डोअर प्रचारासाठी आता 5 ऐवजी 10 लोक भाग घेऊ शकतात. याआधी पाच जणांना दारोदारी जाऊन प्रचार करण्यास मुभा होती.

दरम्यान, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना 300 लोकांसह किंवा स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के हॉलमध्ये सभा घेण्याची परवानगी दिली होती. देशात कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी सर्व राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या रॅलींवर बंदी घातली होती आणि केवळ आभासी प्रचाराला परवानगी होती. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजकीय पक्षांची पदयात्रा, सायकल यात्रा किंवा रोड शो करण्यास बंदी घालण्यात आली होती.

10 मार्चला निकाल, कोणत्या राज्याचं कधी मतदान?

उत्तर प्रदेश – 7 टप्प्यात मतदान मतदान केव्हा? – 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च

उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान

मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारीला आणि 3 मार्चला मतदान

संबंधित बातम्या :

पुन्हा “मोदी”वरून खडाखडी, हायकमांडने झापल्यानंतर नानांनी तयार केला कथित मोदी :- खासदार सुनील मेंढे

Goa Assembly Election 2022 : गोव्यात काँग्रेस उमेदवारांनी घेतली शपथ, भाजपचं टेन्शन वाढलं

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण

VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.