AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखाद्याच्या मृत्यूनंतर परिवारातील लोकं का करतात मुंडन, 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण

भारत हा असंख्य प्रथा आणि परंपरांचा देश आहे. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नियम आहे. काही धर्मांचे नियम हे अगदीच एकमेकांच्या विरुद्धसुद्धा आहे. हिंदूंमध्ये देखील अनेक नियम आहेत. अगदी मुलाच्या जन्मापासून ते लग्न, अंत्यसंस्कार आणि सणांपर्यंत लोकांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत.

एखाद्याच्या मृत्यूनंतर परिवारातील लोकं का करतात मुंडन, 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण
मुंडनImage Credit source: Social Media
| Updated on: May 14, 2023 | 5:58 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात विधींना खूप महत्त्व दिले जाते. मुलाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती आयुष्यभर वेगवेगळे विधी करत असतात. हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराबाबत काही नियम दिलेले आहेत. असे केल्याने आत्मा मुक्त होतो असे मानले जाते. हे नियम पाळले नाहीत तर मृत व्याक्तीच्या आत्माला त्रास होतो असेही माणले जाते. अंत्यविधीच्या वेळी मुंडण (Mundan) करण्याचा नियमही असाच आहे. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

मृत व्याक्तीबद्दल सन्मान दर्शवतो

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्य त्याच्याबद्दल आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी मुंडण करतात. केसांशिवाय सौंदर्य नाही असं म्हणतात.

हानिकारक जीवाणू टाळण्यासाठी

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याच्या मृत्यूनंतर लगेचच त्याचे शरीर सडण्यास सुरुवात होते. त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. या दरम्यान कुटुंबातील सदस्य घरापासून स्मशानभूमीपर्यंत अनेक वेळा मृतदेहाला स्पर्श करतात, त्यामुळे ते त्या हानिकारक जीवाणूंच्या संपर्कात येतात. ते बॅक्टेरियाही केसांना चिकटून राहतात. आंघोळ केल्यावरही बॅक्टेरिया केसांमध्ये राहातात, त्यामुळे केस काढले जातात.

सुतक पूर्ण करण्यासाठी

हिंदू धर्मानुसार, जेव्हा एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येते तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवस कुटुंबात सुतक ज्याला आपण वृद्धी म्हणतो ते पाळले जाते. यावेळी कुटुंबातील सदस्यांना धार्मिक कार्यात सहभागी होता येत नाही. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात सुतक असतो, या काळात धार्मिक विधी करण्यास मनाई आहे. सुतक काळात मुंडन करण्याची प्रथा आहे.

मृत व्यक्तीशी संपर्क होऊ नये यासाठी

गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडण्यास तयार नसतो. यमराजाची भीक मागून तो यमलोकातून परत येते आणि त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. शरीर नसल्यामुळे त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी तो घरच्यांच्या केसांचा आधार घेते. अशी मान्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.