AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगल कार्यात का ठेवले जाते कलश, 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण

सनातन परंपरेत कलश किंवा कुंभ हे सुख, समृद्धी, सौभाग्य आणि शुभेच्छांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक शुभ प्रसंगी त्याची विधीपूर्वक स्थापना केली जाते.

मंगल कार्यात का ठेवले जाते कलश, 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण
कलश Image Credit source: Social Media
| Updated on: May 29, 2023 | 11:10 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेच्या वेळी कलशाची स्थापना (Importance Of Kalash) करण्याचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. सनातन परंपरेत कलश किंवा कुंभ हे सुख, समृद्धी, सौभाग्य आणि शुभेच्छांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक शुभ प्रसंगी त्याची विधीपूर्वक स्थापना केली जाते. कलशाचे महत्त्व अशा प्रकारे समजू शकते की त्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. नवरात्री, दीपावली इत्यादी सर्व प्रकारच्या तीज-उत्सवांसोबत विविध धार्मिक विधी आणि शुभ कार्यात पुजल्या जाणार्‍या कलशाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आणि पद्धत जाणून घेऊया.

कलशाचे धार्मिक महत्त्व

कोणत्याही पूजेत वापरला जाणारा मंगल कलश हा समुद्रमंथनात निघालेल्या अमृताच्या भांड्यासमान मानला जातो, कारण आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करून शुभ फल प्राप्त करण्याचे ते माध्यम बनते. कलशात नवग्रह, 27 नक्षत्रे आणि  तीर्थांचा समावेश साहतो असे मानले जाते. यामुळेच कोणत्याही विशेष कार्यात शुभ आणि यशासाठी कार्य सुरू करताना कलशाची स्थापना करून विशेष पूजा केली जाते.

कलश करेल तुमची इच्छा पूर्ण

  • सनातन परंपरेत शक्तीच्या उपासनेमध्ये कलशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. देवीच्या उपासनेमध्ये कलशाची स्थापना केल्याने सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय आणि यश मिळते.
  • वास्तूनुसार घराच्या दारात कलश ठेवल्याने सुख-समृद्धी येते, पण या कलशाचे तोंड रुंद आणि उघडे असावे हे लक्षात ठेवा. शुभ परिणाम वाढवण्यासाठी तुम्ही या कलशावर अशोकाची पाने आणि ताजी फुले देखील ठेवू शकता.
  • ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांशी झगडत असाल तर ते दूर करण्यासाठी लक्ष्मी कलशाची स्थापना करून घरात पैशाचा साठा भरावा.
  • घराच्या ईशान्य कोपर्‍यात कलश ठेवल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात असे मानले जाते. घरामध्ये तांब्याचा शुभ कलश स्थापित करणे खूप शुभ मानले जाते.
  • असे मानले जाते की कोणत्याही शुभ कार्यात कलशात नारळ ठेवून त्याची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.