AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगल कार्यात का ठेवले जाते कलश, 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण

सनातन परंपरेत कलश किंवा कुंभ हे सुख, समृद्धी, सौभाग्य आणि शुभेच्छांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक शुभ प्रसंगी त्याची विधीपूर्वक स्थापना केली जाते.

मंगल कार्यात का ठेवले जाते कलश, 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण
कलश Image Credit source: Social Media
| Updated on: May 29, 2023 | 11:10 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेच्या वेळी कलशाची स्थापना (Importance Of Kalash) करण्याचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. सनातन परंपरेत कलश किंवा कुंभ हे सुख, समृद्धी, सौभाग्य आणि शुभेच्छांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक शुभ प्रसंगी त्याची विधीपूर्वक स्थापना केली जाते. कलशाचे महत्त्व अशा प्रकारे समजू शकते की त्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. नवरात्री, दीपावली इत्यादी सर्व प्रकारच्या तीज-उत्सवांसोबत विविध धार्मिक विधी आणि शुभ कार्यात पुजल्या जाणार्‍या कलशाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आणि पद्धत जाणून घेऊया.

कलशाचे धार्मिक महत्त्व

कोणत्याही पूजेत वापरला जाणारा मंगल कलश हा समुद्रमंथनात निघालेल्या अमृताच्या भांड्यासमान मानला जातो, कारण आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करून शुभ फल प्राप्त करण्याचे ते माध्यम बनते. कलशात नवग्रह, 27 नक्षत्रे आणि  तीर्थांचा समावेश साहतो असे मानले जाते. यामुळेच कोणत्याही विशेष कार्यात शुभ आणि यशासाठी कार्य सुरू करताना कलशाची स्थापना करून विशेष पूजा केली जाते.

कलश करेल तुमची इच्छा पूर्ण

  • सनातन परंपरेत शक्तीच्या उपासनेमध्ये कलशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. देवीच्या उपासनेमध्ये कलशाची स्थापना केल्याने सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय आणि यश मिळते.
  • वास्तूनुसार घराच्या दारात कलश ठेवल्याने सुख-समृद्धी येते, पण या कलशाचे तोंड रुंद आणि उघडे असावे हे लक्षात ठेवा. शुभ परिणाम वाढवण्यासाठी तुम्ही या कलशावर अशोकाची पाने आणि ताजी फुले देखील ठेवू शकता.
  • ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांशी झगडत असाल तर ते दूर करण्यासाठी लक्ष्मी कलशाची स्थापना करून घरात पैशाचा साठा भरावा.
  • घराच्या ईशान्य कोपर्‍यात कलश ठेवल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात असे मानले जाते. घरामध्ये तांब्याचा शुभ कलश स्थापित करणे खूप शुभ मानले जाते.
  • असे मानले जाते की कोणत्याही शुभ कार्यात कलशात नारळ ठेवून त्याची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.