AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी कुठली ना कुठली समस्या असते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य इतके महान व्यक्ती होते की शतकांनंतरही लोक त्यांचे नाव आणि त्यांचे कथन मोठ्या आदराने स्मरण करतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. आचार्यांनी आयुष्यभर केवळ लोकांच्या भल्यासाठी काम केले. तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर आचार्य अनेक वर्षे येथे शिक्षक म्हणून राहिले आणि सर्व मुलांचे भविष्य त्यांनी उज्वल केले. तसेच अनेक रचना केल्या. त्यांच्यातील नीति शास्त्र आजही खूप लोकप्रिय आहे.

Chanakya Niti | अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी कुठली ना कुठली समस्या असते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
CHANAKYA-NITI
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 12, 2021 | 8:07 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य इतके महान व्यक्ती होते की शतकांनंतरही लोक त्यांचे नाव आणि त्यांचे कथन मोठ्या आदराने स्मरण करतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. आचार्यांनी आयुष्यभर केवळ लोकांच्या भल्यासाठी काम केले. तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर आचार्य अनेक वर्षे येथे शिक्षक म्हणून राहिले आणि सर्व मुलांचे भविष्य त्यांनी उज्वल केले. तसेच अनेक रचना केल्या. त्यांच्यातील नीति शास्त्र आजही खूप लोकप्रिय आहे.

नीतिशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचार्यांची धोरणे एखाद्या व्यक्तीला धर्म आणि ज्ञानाच्या आधारावर योग्य आणि चुकीचा फरक करण्यास शिकवतात. जर एखाद्या व्यक्तीने आचार्यांचे शब्द समजून घेतले आणि ते आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केला तर तो जीवनातील सर्व अडचणींवर सहज मात करु शकतो. पुस्तकाच्या सातव्या अध्यायातील बाराव्या श्लोकात आचार्यांनी अशा लोकांबद्दल सांगितले आहे जे आयुष्यात एक ना दुसऱ्या कारणाने त्रस्त राहतात कारण त्यांच्या आयुष्यातील समस्या संपण्याचे नाव घेत नाही.

नात्यन्तं सरलेन भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम्, छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः

या श्लोकात आचार्यांनी मानवाची तुलना झाडांशी केली आहे आणि म्हटले आहे की ज्या लोकांचा स्वभाव अत्यंत साधा आहे त्यांनी हा स्वभाव बदलला पाहिजे कारण जा झाडे सरळ असतात तीच जंगलात प्रथम कापली जातात.

आचार्यांच्या या श्लोकात खूप खोल अर्थ दडलेला आहे. या श्लोकाद्वारे आचार्यांनी प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे हे लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही खूप सरळ, साधे आणि सहजगत्या जगणारे व्यक्ती असाल तर तुम्हाला त्याचा फटका सहन करावा लागेल. हुशार लोक अशा लोकांचा पुरेपूर फायदा घेतात आणि त्यांच्यासाठी दररोज अडचणी निर्माण करतात.

बऱ्याच वेळा या लोकांना त्यांच्या कोणत्याही दोषामुळे त्रास सहन करावा लागतो. यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्रास होतो. म्हणूनच एखादी व्यक्ती इतकी तीक्ष्ण आणि हुशार असली पाहिजे की तो अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करु शकेल. आपण आपले ध्येय साध्य करु शकता आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशा प्रकारे पैसा कमवाल तर तुम्हाला कधीही मान-सन्मान मिळणार नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti : संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांचे हे 5 मंत्र लक्षात ठेवा, घरात धन-धान्याची कमतरता कधीही भासणार नाही

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली