AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | अशा प्रकारे पैसा कमवाल तर तुम्हाला कधीही मान-सन्मान मिळणार नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

एक महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी असण्याव्यतिरिक्त आचार्य चाणक्य सर्व विषयांचे जाणकार होते. आचार्य चाणक्याचे खरे नाव विष्णुगुप्त होते. परंतु आचार्य श्री चणक यांचे शिष्य असल्याने त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाऊ लागले. आचार्य चाणक्य यांनी आपल्या महान ज्ञानाचा उपयोग लोककल्याण, अखंड भारताची निर्मिती आणि इतर सृजनशील कामे करण्यासाठी केला, म्हणून त्यांना कौटिल्य असेही म्हटले जाते.

Chanakya Niti | अशा प्रकारे पैसा कमवाल तर तुम्हाला कधीही मान-सन्मान मिळणार नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
स्वतःचे त्रास स्वत: पर्यंत ठेवा - चाणक्य नीतीनुसार, तुमच्या आयुष्यातील त्रास इतरांना शेअर करणे टाळले पाहिजे. तुमची समस्या जाणून घेतल्यानंतर लोक तुमची थट्टा करतील. तुम्हाला त्यांच्या कडून कोणतीच मदत होणार नाही.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 08, 2021 | 8:06 AM
Share

मुंबई : एक महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी असण्याव्यतिरिक्त आचार्य चाणक्य सर्व विषयांचे जाणकार होते. आचार्य चाणक्याचे खरे नाव विष्णुगुप्त होते. परंतु आचार्य श्री चणक यांचे शिष्य असल्याने त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाऊ लागले. आचार्य चाणक्य यांनी आपल्या महान ज्ञानाचा उपयोग लोककल्याण, अखंड भारताची निर्मिती आणि इतर सृजनशील कामे करण्यासाठी केला, म्हणून त्यांना कौटिल्य असेही म्हटले जाते.

त्यांनी अनेक रचना केल्या आहेत ज्या आजही लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांच्या नीति शास्त्रात अशा अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत ज्याद्वारे लोकांना सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये मार्गदर्शन मिळते. आचार्यांनी पैशासंदर्भात सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

1. स्वाभिमान गमावून कमावलेला पैसा वाया जातो

आचार्य चाणक्य म्हणतात, एखाद्या व्यक्तीने कधीही आपला स्वाभिमान गमावू नये. कठोर अत्याचार सहन करुन, शोषित होऊन आणि स्वाभिमान गमावून मिळवलेली संपत्ती व्यर्थ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे पैसे कमवण्याच्या मागे लागून एखादी व्यक्ती आपला आदर गमावते. धनरहित आयुष्यापेक्षा आदर नसलेले जीवन अधिक कठीण असते. त्यामुळे अशा पैशांचा त्याग केला पाहिजे.

2. पैशांसाठी तत्त्वांशी तडजोड करणे महागात पडेल

आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीने दोन पैशांची कमाईही कष्टाने केली पाहिजे. एखाद्याने पैशांचा लोभी नसावे किंवा त्याबद्दल कोणाचाही हेवा करु नये. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा. जे आपल्या तत्त्वांशी तडजोड करुन, चुकीच्या मार्गाचा अवलंब करुन आणि सद्गुणांचा त्याग करुन पैसे कमवतात ते प्रत्यक्षात पैशांच्या स्वरुपात पाप कमावतात. एखाद्या व्यक्तीसाठी असे पैसे कमावणे खूप महागात पडू शकते. तसेच अशा लोकांना समाजात मान मिळत नाही.

3. चापलुसी करुन कमावलेल्या पैशांचा त्याग करणेच चांगले

आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्याने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी तडजोड करु नये. चापलुसी करणाऱ्यांच्या आयुष्यात काही मूल्य नसतात. अशा लोकांनी कितीही पैसा कमवला तरी, ते कधीच खरा आदर मिळवू शकत नाहीत. अशा पैशांचा त्याग करणेच चांगले.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या परिस्थितींमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलंही शत्रू बनतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti | वाईट काळात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच