Chanakya Niti | या परिस्थितींमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलंही शत्रू बनतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 06, 2021 | 7:41 AM

आचार्य चाणक्य यांच्या मते, वडिलांनी घेतलेले कर्ज हे त्याच्या मुलासाठी शत्रूसारखे आहे. जर वडील वेळेवर कर्जाची परतफेड करु शकले नाहीत तर मुलाचे आयुष्य दुःखदायक होते. या परिस्थितीत वडील आपल्या मुलासाठी शत्रूसारखे असतात.

Chanakya Niti | या परिस्थितींमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलंही शत्रू बनतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
CHANAKYA-NITI

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. आपल्या मुत्सद्दीपणा आणि राजकारणाने त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला एका सामान्य मुलापासून सम्राट बनवले. ते एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी आयुष्यात अनेक ग्रंथ लिहिले. पण आजही लोकांना चाणक्य नीति वाचायला आवडते. चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र पुस्तकात जीवनातील प्रत्येक पैलूबद्दल लिहिले आहे. जर एखाद्या व्यक्तीने या धोरणांचे पालन केले तर त्याला नक्कीच यश मिळते. आचार्य चाणक्यांची ही धोरणे जीवनाचे सत्य सांगतात. चाणक्य यांनी नीतिशास्त्रात विशिष्ट परिस्थितीत पालक, पती-पत्नी आणि मुलांचे शत्रू म्हणून वर्णन केले आहे. जाणून घेऊ –

आचार्य चाणक्य यांच्या मते, वडिलांनी घेतलेले कर्ज हे त्याच्या मुलासाठी शत्रूसारखे आहे. जर वडील वेळेवर कर्जाची परतफेड करु शकले नाहीत तर मुलाचे आयुष्य दुःखदायक होते. या परिस्थितीत वडील आपल्या मुलासाठी शत्रूसारखे असतात.

आई आणि तिची मुले यांच्यातील संबंध सर्वात सुदर असतात. पण जेव्हा आई आपल्या मुलांमध्ये भेदभाव करायला लागते, तेव्हा असे वर्तन मुलांसाठी शत्रूसारखे असते. या व्यतिरिक्त, ज्या स्त्रिया इतर पुरुषांशी संबंध ठेवतात त्या त्यांच्या मुलांसाठी शत्रूसारख्या असतात. याशिवाय, जे पालक आपल्या मुलांना अशिक्षित ठेवतात. ते त्यांच्या मुलांचे शत्रू आहेत.

आचार्य चाणक्य म्हणतात की खूप सुंदर पत्नी कधीकधी पतीसाठी समस्या बनते. या व्यतिरिक्त, जो पती आपल्या पत्नीचे संरक्षण करु शकत नाही तो शत्रूसारखा असतो.

चाणक्य आचारशास्त्रात असे सांगितले आहे की जो मुलगा मूर्ख आहे तो त्याच्या पालकांसाठी शत्रूपेक्षा कमी नाही. मूर्ख मुले पालकांच्या दुःखाचे कारण बनतात. याशिवाय जे मूल आपल्या आई -वडिलांचे ऐकत नाही, ते मूल शत्रूपेक्षा कमी नाही. त्याच वेळी, जे पालक आपल्या मुलांना चांगले संगोपन आणि शिक्षण देत नाहीत ते त्यांच्या मुलांसाठी शत्रूसारखे असतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या समस्यांना लहानसहान लेखून दुर्लक्ष केले तर विनाशाला द्याल आमंत्रण

Chanakya Niti | एक सर्वोत्तम लीडर होण्यासाठी व्यक्तीमध्ये हे तीन गुण असणे असते आवश्यक

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI