AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या परिस्थितींमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलंही शत्रू बनतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य यांच्या मते, वडिलांनी घेतलेले कर्ज हे त्याच्या मुलासाठी शत्रूसारखे आहे. जर वडील वेळेवर कर्जाची परतफेड करु शकले नाहीत तर मुलाचे आयुष्य दुःखदायक होते. या परिस्थितीत वडील आपल्या मुलासाठी शत्रूसारखे असतात.

Chanakya Niti | या परिस्थितींमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलंही शत्रू बनतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
CHANAKYA-NITI
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 7:41 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. आपल्या मुत्सद्दीपणा आणि राजकारणाने त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला एका सामान्य मुलापासून सम्राट बनवले. ते एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी आयुष्यात अनेक ग्रंथ लिहिले. पण आजही लोकांना चाणक्य नीति वाचायला आवडते. चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र पुस्तकात जीवनातील प्रत्येक पैलूबद्दल लिहिले आहे. जर एखाद्या व्यक्तीने या धोरणांचे पालन केले तर त्याला नक्कीच यश मिळते. आचार्य चाणक्यांची ही धोरणे जीवनाचे सत्य सांगतात. चाणक्य यांनी नीतिशास्त्रात विशिष्ट परिस्थितीत पालक, पती-पत्नी आणि मुलांचे शत्रू म्हणून वर्णन केले आहे. जाणून घेऊ –

आचार्य चाणक्य यांच्या मते, वडिलांनी घेतलेले कर्ज हे त्याच्या मुलासाठी शत्रूसारखे आहे. जर वडील वेळेवर कर्जाची परतफेड करु शकले नाहीत तर मुलाचे आयुष्य दुःखदायक होते. या परिस्थितीत वडील आपल्या मुलासाठी शत्रूसारखे असतात.

आई आणि तिची मुले यांच्यातील संबंध सर्वात सुदर असतात. पण जेव्हा आई आपल्या मुलांमध्ये भेदभाव करायला लागते, तेव्हा असे वर्तन मुलांसाठी शत्रूसारखे असते. या व्यतिरिक्त, ज्या स्त्रिया इतर पुरुषांशी संबंध ठेवतात त्या त्यांच्या मुलांसाठी शत्रूसारख्या असतात. याशिवाय, जे पालक आपल्या मुलांना अशिक्षित ठेवतात. ते त्यांच्या मुलांचे शत्रू आहेत.

आचार्य चाणक्य म्हणतात की खूप सुंदर पत्नी कधीकधी पतीसाठी समस्या बनते. या व्यतिरिक्त, जो पती आपल्या पत्नीचे संरक्षण करु शकत नाही तो शत्रूसारखा असतो.

चाणक्य आचारशास्त्रात असे सांगितले आहे की जो मुलगा मूर्ख आहे तो त्याच्या पालकांसाठी शत्रूपेक्षा कमी नाही. मूर्ख मुले पालकांच्या दुःखाचे कारण बनतात. याशिवाय जे मूल आपल्या आई -वडिलांचे ऐकत नाही, ते मूल शत्रूपेक्षा कमी नाही. त्याच वेळी, जे पालक आपल्या मुलांना चांगले संगोपन आणि शिक्षण देत नाहीत ते त्यांच्या मुलांसाठी शत्रूसारखे असतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या समस्यांना लहानसहान लेखून दुर्लक्ष केले तर विनाशाला द्याल आमंत्रण

Chanakya Niti | एक सर्वोत्तम लीडर होण्यासाठी व्यक्तीमध्ये हे तीन गुण असणे असते आवश्यक

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.