AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या समस्यांना लहानसहान लेखून दुर्लक्ष केले तर विनाशाला द्याल आमंत्रण

प्रत्येक गोष्टीला त्याचे स्थान आणि उपयुक्तता असते. जर घरात साप निघाला तर लोक त्याला मारण्यासाठी धावतात, पण जर तोच साप शिवलिंगाभोवती बसला असेल तर तेच लोक देवता म्हणून त्याची पूजा करायला लागतात. हे सिद्ध करते की कोणत्याही गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष केले जाऊ नये, कारण त्याचे स्थान आणि काळानुसार स्वतःचे महत्त्व आहे. आचार्य चाणक्य यांचाही असाच विश्वास होता.

Chanakya Niti | या समस्यांना लहानसहान लेखून दुर्लक्ष केले तर विनाशाला द्याल आमंत्रण
आचार्य आपल्या धोरणात म्हणतात की ज्या व्यक्तीचे ज्ञान पुस्तकांमध्ये बंदिस्त आहे आणि ज्याने आपली संपत्ती इतरांच्या हाती सोपवली आहे, तो गरज असतानाही कोणत्याही ज्ञानाचा किंवा संपत्तीचा वापर करू शकत नाही.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 03, 2021 | 7:30 AM
Share

मुंबई : प्रत्येक गोष्टीला त्याचे स्थान आणि उपयुक्तता असते. जर घरात साप निघाला तर लोक त्याला मारण्यासाठी धावतात, पण जर तोच साप शिवलिंगाभोवती बसला असेल तर तेच लोक देवता म्हणून त्याची पूजा करायला लागतात. हे सिद्ध करते की कोणत्याही गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष केले जाऊ नये, कारण त्याचे स्थान आणि काळानुसार स्वतःचे महत्त्व आहे. आचार्य चाणक्य यांचाही असाच विश्वास होता. आचार्यांच्या मते, एखादी छोटी गोष्ट विचारात घेऊन आपण निष्काळजी बनतो आणि नंतर मोठे नुकसान सहन करतो.

आचार्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात अशा तीन गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यांना कधीही लहान समजण्याची चूक करु नये, अन्यथा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.

1. कर्ज मिळवणे सोपे आहे आणि ते देणे तितकेच कठीण आहे. जर तुम्ही कर्जाला लहान गोष्ट समजण्याची चूक केली तर ते दिवसेंदिवस वाढते आणि ते फेडणे तुमच्यासाठी कठीण होते. अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती विनाशाच्या मार्गावर पोहोचते. म्हणून प्रयत्न करा की कर्ज घेण्याची गरजच पडू नये आणि जरी तुम्ही कोणत्याही कारणास्तव कर्ज घेत असाल तर त्या प्रकरणात गंभीर व्हा आणि शक्य तितक्या लवकर त्याची परतफेड करा.

2. जरी शत्रू तुमच्यापेक्षा दुबळा असला तरी त्याला लहान समजण्याची चूक कधीही करु नका. जरी तो कमकुवत असला तरी तो तुमचा शत्रू आहे, म्हणून जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो त्याचा हल्ला चुकवणार नाही. म्हणून, शत्रूला दुर्बळ मानून कधीही शांत बसू नका. नेहमी सतर्क रहा आणि प्रत्येक परिस्थितीत शत्रूशी सामना करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा.

3. कोणताही आजार लहान मानून कधीही निष्काळजी होऊ नये. एकदा तुम्ही बेफिकीर झालात, की तुमचा आजार कधी वाढेल आणि तुमच्यासाठी समस्या बनेल हे तुम्हालाही कळणार नाही. म्हणून, सुरुवातीला सतर्क राहून, तो रोग मोठा होण्यापासून थांबवा आणि त्यावर योग्य उपचार करा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | लोकांची पारख करायची असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | आनंदी आयुष्य हवंय, तर आचार्य चाणक्य यांच्या या धोरणांचं पालन करा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली