AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांचे हे 5 मंत्र लक्षात ठेवा, घरात धन-धान्याची कमतरता कधीही भासणार नाही

गुरु तो जो शिष्याच्या जीवनाची दिशा ठरवतो. आचार्य चाणक्य हेही असेच एक गुरु होते, ज्यांनी अनेक शिष्यांना शिक्षा देऊन त्यांना योग्य दिशा दाखवून त्यांचे भविष्य घडवले. एक महान विचारवंत, मुत्सद्दी, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि येथे शिक्षकाचे पद सांभाळून सर्व मुलांच्या भविष्याची काळजी घेतली.

Chanakya Niti : संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांचे हे 5 मंत्र लक्षात ठेवा, घरात धन-धान्याची कमतरता कधीही भासणार नाही
Chanakya Niti
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 07, 2021 | 7:37 AM
Share

मुंबई : गुरु तो जो शिष्याच्या जीवनाची दिशा ठरवतो. आचार्य चाणक्य हेही असेच एक गुरु होते, ज्यांनी अनेक शिष्यांना शिक्षा देऊन त्यांना योग्य दिशा दाखवून त्यांचे भविष्य घडवले. एक महान विचारवंत, मुत्सद्दी, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि येथे शिक्षकाचे पद सांभाळून सर्व मुलांच्या भविष्याची काळजी घेतली.

यासह त्यांनी अशा अनेक रचना केल्या आहेत ज्या आजही लोकांना मार्गदर्शन करतात. सर्वात लोकप्रिय रचनांपैकी एक म्हणजे आचार्यांचे नीतिशास्त्र. या पुस्तकात आचार्यांनी जीवनातील प्रत्येक पैलूवर आपले विचार मांडून लोकांना योग्य दिशा दाखवली आहे. आचार्य चाणक्य यांनी पैशांबद्दलही बरेच काही सांगितले आहे. पैसे कमवणे, बचत करणे आणि गुंतवणूक करणे याविषयी चाणक्य नीति काय म्हणते ते येथे जाणून घ्या.

1. आचार्य चाणक्य यांनी संपत्तीला खरा मित्र म्हटले आहे आणि ते साठवण्याविषयी सांगितले आहे. आचार्यांच्या मते, पैसे नेहमी प्रामाणिकपणे कमावले पाहिजेत. तसेच, ते कमावल्यानंतर, निश्चितपणे गुंतवणूक केली पाहिजे.

2. चाणक्य म्हणतात की एखादी व्यक्ती जे काही पैसे कमवते ते पूर्णपणे वाचवणे मूर्खपणाचे आहे. पैसे वाचवण्याचा आणि वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. घरात ठेवलेल्या पैशांची पाण्याशी तुलना करताना त्यांनी म्हटले आहे की, जसे एका ठिकाणी साठवलेले पाणी वापरले नाही तर ते खराब होते, त्याचप्रमाणे जर पैसे गुंतवले नाहीत तर पैसे वाया जातात.

3. आचार्यांचा असा विश्वास होता की पैसा हा माणसाचा असा साथीदार आहे जो त्याला नेहमी साथ देतो. जेव्हा त्याचे स्वतःचे लोक त्याला सोडून जातात तेव्हा पैसा त्याच्या कामात येतात. त्यामुळे पाण्यासारखा पैसा वाया घालण्याची चूक कधीही करु नका. तुम्हाला लागणारे सर्व पैसे खर्च करा, उरलेले पैसे गुंतवा, जेणेकरुन ते पैसे दिवसेंदिवस वाढतील आणि तुमच्या वाईट काळात तुमच्या उपयोगात येतील.

4. पैसे कमवण्यासाठी हे अधिक महत्त्वाचे आहे की तुम्ही कुठल्या अशा स्थानावर राहावे जिथे रोजगाराचे पुरेशी साधने आहेत. जेणेकरुन तुम्ही तुमची नोकरी गमावली तरीही तुमच्याकडे पैसे कमवण्याचे अनेक पर्याय असतील. या व्यतिरिक्त, तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत यासाठी तुमचे आर्थिक ध्येय निश्चित केले पाहिजे. जोपर्यंत तुमचे ध्येय निश्चित होत नाही तोपर्यंत तुम्ही पैशांच्या कमतरतेवर कधीही मात करु शकणार नाही.

5. तुम्ही जे काही पैसे कमवाल, त्याचा काही भाग नक्कीच दान करा. आचार्यांचा असा विश्वास होता की पैशांचा नेहमी चांगला वापर केला पाहिजे. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दान करणे. यामुळे गरजूंना आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | वाईट काळात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

Chanakya Niti | या समस्यांना लहानसहान लेखून दुर्लक्ष केले तर विनाशाला द्याल आमंत्रण

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली