AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adhikmass : अधिकमासातील पंचमी तिथी आज, या उपायांनी दूर होईल आर्थिक संकट

तिळाचे तेल वाटीत किंवा एखाद्या पात्रात घेऊन त्यात स्वःताचे प्रतिबींब पाहावे, त्यानंतर ते तेल एखाद्या गरीबाला किंवा शनि मंदिरात दान करावे. या विधीला छायादान असे म्हणतात.

Adhikmass : अधिकमासातील पंचमी तिथी आज, या उपायांनी दूर होईल आर्थिक संकट
अधिकमासImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 22, 2023 | 11:59 AM
Share

मुंबई : हिंदू पंचांगानुसार, या वर्षी 18 जुलै 2023, मंगळवारपासून अधिक मास सुरू होत आहे. 16 ऑगस्ट 2023, बुधवारी संपेल. अधिक महिन्यांमुळे श्रावण 59 दिवसांचा असेल. अधिकमासामध्ये पंचमी (Adhikmass Panchami) तिथीला विशेष महत्त्व आहे. आधिक महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी 22 जुलै 2023 रोजी शनिवारी येत आहे. ही तिथी शुभ मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीला आर्थिक लाभ मिळू शकतो.

तुळशीचे खास उपाय

तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही.

पंचमी तिथीला अवश्य करावे हे काम

तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावा. हा उपाय केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. यासोबतच या दिवशी धनप्राप्तीसाठी आदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ करा.

हनुमानाला रूईच्या पानांचा हार घालावा

अधिकमासातील पंचमी तिथीला रूईच्या पानांचा हार बनवून हनुमानाला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला हनुमानाची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरातील सर्व प्रकारचे दोषही या उपायाने दूर होतात.

छायादान करा

तिळाचे तेल वाटीत किंवा एखाद्या पात्रात घेऊन त्यात स्वःताचे प्रतिबींब पाहावे, त्यानंतर ते तेल एखाद्या गरीबाला किंवा शनि मंदिरात दान करावे. या विधीला छायादान असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक व्याधी होत असतील तर त्याच्यासाठी छाया दान करणे खूप फायदेशीर आहे. अशा व्यक्तीने छायादान दान करावे.

छाया दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते. शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. शनिदेवाच्या दुःखापासून माणसाला मुक्ती मिळते. छाया दान माणसातील नकारात्मक विचार आणि घरातील वाईट गोष्टींना संपवते. सावली दान केल्याने व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता असेल किंवा जे काही दुःख असेल ते सर्व तुमच्या सावलीसह परोपकारात जातात. व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि व्यक्तीला आरोग्य मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.