AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badrinath Temple : बद्रीनाथ मंदिराचे दार उघडण्याआधी का केली जाते गरूडाची पुजा

या वर्षी भगवान बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे पारंपारिक पद्धतीने पूजा केल्यानंतर सकाळी 07:00 वाजता उघडण्यात येणार आहेत. जोशीमठ येथील नरसिंह मंदिरात मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी गरुड छड उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

Badrinath Temple : बद्रीनाथ मंदिराचे दार उघडण्याआधी का केली जाते गरूडाची पुजा
बद्रीनाथ मंदिरImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 24, 2023 | 3:13 PM
Share

मुंबई : उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम (Badrinath Temple) हे भगवान विष्णूच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. जगाचे पालनहर्ते मानल्या जाणाऱ्या श्री हरींच्या या पवित्र मंदिराचे दरवाजे 27 एप्रिल 2023 रोजी सहा महिन्यांनी उघडणार आहेत. या वर्षी भगवान बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे पारंपारिक पद्धतीने पूजा केल्यानंतर सकाळी 07:00 वाजता उघडण्यात येणार आहेत. जोशीमठ येथील नरसिंह मंदिरात मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी गरुड छड उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. जोशीमठ येथे दरवर्षी होणाऱ्या या गरुड छड जत्रेत भगवान बद्रीनाथाचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. भगवान बद्रीनाथच्या पूजेशी संबंधित या परंपरेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

गरुड पूजेचे धार्मिक महत्त्व

ज्योतिर्मठशी संबंधित स्वामी मुकुंदानंद जी यांच्या मते, भगवान बद्रीनाथचे दरवाजे उघडण्यापूर्वी साजरे होणाऱ्या गरुड छड उत्सवाची परंपरा भगवान विष्णू आणि गरुड यांच्याशी संबंधित आहे, ज्यांना त्यांचे वाहन मानले जाते. गरुड छड उत्सवाच्या दिवशी भगवान विष्णू गरुडावर स्वार होऊन आपल्या पवित्र निवासस्थानासाठी जोशीमठ सोडतात. गरुड छड उत्सवात भगवान विष्णू आणि गरुडाचे प्रतीक दोरीच्या साहाय्याने आणले जाते. धार्मिक परंपरेनुसार दरवर्षी या उत्सवात गरुड देवतेची लाकडी मूर्ती दोरीने बांधून दुसऱ्या टोकाला सोडली जाते.

गरुड छड सण कसा साजरा केला जातो?

भगवान बद्रीनाथ यांच्याशी संबंधित या परंपरेचे पालन करण्यासाठी मोठ्या संख्येने वैष्णव भाविक जोशीमठ येथे हजेरी लावतात. ज्या स्त्रीला दोरीला जोडलेल्या गरूड देवतेचा पवित्र स्पर्श होतो, तिला पूर्ण आशीर्वाद मिळतो आणि तिची निरोगी व सुंदर मूल होण्याची इच्छा लवकर पूर्ण होते, अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. बद्रीनाथ मंदिराशी संबंधित पुजारीच्या मते, गरुड देवतेची ही मूर्ती खूप जुनी आहे आणि तिचे पौराणिक महत्त्व मोठे आहे. ही पवित्र मूर्ती गरुड देवतेने अर्धा किलोमीटर लांब दोरीच्या सहाय्याने प्रतिकात्मकपणे बद्रीनाथ मंदिराकडे नेली आहे. गरुड छड उत्सवाच्या दिवशी जोशीमठ येथील नृसिंह मंदिरात पूजा-पाठ, भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात.

पुजेनंतर बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील

गरुड छड उत्सवानंतर गरुड घडाळा टिहरी गढवालच्या महाराजांच्या ठिकाणी असलेल्या नरसिंह मंदिरात पोहोचेल. यानंतर उद्या 25 एप्रिल रोजी ही कलश यात्रा पांडुकेश्वर येथे पोहोचून 26 एप्रिल 2023 रोजी बद्रीविशाल धाम आणि दुसऱ्या दिवशी रावल पुजार्‍यांच्या हस्ते देवाच्या मंदिराचे भव्य कपाट सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.