AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : आचार्य चाणाक्य यांच्या मते अशा प्रकाची मुलं करतात कुळाचा नाश

चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले असते, ज्याच्या मनात इतरांबद्दल द्वेष नसतो, तो विश्वासार्ह असतो. त्या व्यक्तीसोबत राहताना महिलांबद्दल त्याच्या मनाची धारणा काय आहे हे तपासा.

Chanakya Neeti : आचार्य चाणाक्य यांच्या मते अशा प्रकाची मुलं करतात कुळाचा नाश
चाणाक्य निती
| Updated on: May 19, 2023 | 2:11 PM
Share

मुंबई : आचार्य चाणक्यांची निती (Chanakya Neeti) माणसाला प्रत्येक पावलावर साथ देतात आणि वाईट काळातून बाहेर पडण्यास मदत करतात. शेकडो वर्षांनंतरही आचार्य चाणक्याची शिकवण लोकांना जीवनात मार्गदर्शन करत आहे. आचार्य चाणक्य यांचे हे 4 श्लोक जर तुम्हीही तुमच्या जीवनात अवलंबवले तर तुम्हीही एक सज्जन आणि श्रेष्ठ व्यक्ती ओळखू शकाल. जाणून घेऊया आचार्य चाणक्याचे हे 4 मुख्य श्लोक.

।। निहन्ति दुर्वचनं कुलम् ।।

आचार्य चाणक्य यांच्या मते, वाईट आणि नकारात्मक बोलण्याने संपूर्ण कुटुंब नष्ट होते. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, कठोर शब्द बोलणारा वंश कलंकित करतो तर गोड बोलणे उच्च कुळातील असल्याचा दाखला देतो. तोंडातून वाणी बाहेर पडताच तो कोणत्या कुळात जन्मला हे कुळाचे मोठेपण प्रथम कळते. म्हणूनच माणसाने आपल्या कुळाच्या अभिमानासाठी चांगली आणि गोड भाषा वापरली पाहिजे.

।। न पुत्रसंस्पर्शात् परं सुखम् ।।

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात पुढे म्हटले आहे की, पुत्रप्राप्तीपेक्षा मोठे दुसरे सुख नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते पुत्रप्राप्ती हे सांसारिक सुखांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. बहुधा या सृष्टीची परंपरा पुढे नेण्यासाठीच निर्मात्याने आईवडिलांच्या मनात पुत्राची ओढ निर्माण केली असावी.

।। निशान्ते कार्यं चिन्तयेत्।।

आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने दररोज सकाळी दिवसभरातील कामांचा विचार केला पाहिजे. माणसाला सकाळी उठल्यावर दिवसभर काय कार्यक्रम आहे याचा विचार करायला हवा. याचा विचार केल्याने कामांबाबतची कोंडी संपते आणि त्याचा संपूर्ण दिवस ठरलेल्या वेळापत्रकानुसार जातो.

|| विवादे धर्ममनुस्मरेत् ||

या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी वादाच्या वेळी धर्मानुसार वागावे असे सांगितले आहे. चाणक्य म्हणतो की, परस्पर भांडण किंवा कलहाच्या वेळी धर्माची काळजी घेतली पाहिजे. धर्म विसरता कामा नये. जो माणूस भांडणाच्या वेळीही धर्माचे स्मरण करतो, तो महापाप करण्यापासून वाचतो, कारण भांडणाच्या वेळी माणूस रागाच्या भरात काहीही करू शकतो, त्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....