AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : आचार्य चाणाक्य यांच्या मते अशा प्रकाची मुलं करतात कुळाचा नाश

चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले असते, ज्याच्या मनात इतरांबद्दल द्वेष नसतो, तो विश्वासार्ह असतो. त्या व्यक्तीसोबत राहताना महिलांबद्दल त्याच्या मनाची धारणा काय आहे हे तपासा.

Chanakya Neeti : आचार्य चाणाक्य यांच्या मते अशा प्रकाची मुलं करतात कुळाचा नाश
चाणाक्य निती
| Updated on: May 19, 2023 | 2:11 PM
Share

मुंबई : आचार्य चाणक्यांची निती (Chanakya Neeti) माणसाला प्रत्येक पावलावर साथ देतात आणि वाईट काळातून बाहेर पडण्यास मदत करतात. शेकडो वर्षांनंतरही आचार्य चाणक्याची शिकवण लोकांना जीवनात मार्गदर्शन करत आहे. आचार्य चाणक्य यांचे हे 4 श्लोक जर तुम्हीही तुमच्या जीवनात अवलंबवले तर तुम्हीही एक सज्जन आणि श्रेष्ठ व्यक्ती ओळखू शकाल. जाणून घेऊया आचार्य चाणक्याचे हे 4 मुख्य श्लोक.

।। निहन्ति दुर्वचनं कुलम् ।।

आचार्य चाणक्य यांच्या मते, वाईट आणि नकारात्मक बोलण्याने संपूर्ण कुटुंब नष्ट होते. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, कठोर शब्द बोलणारा वंश कलंकित करतो तर गोड बोलणे उच्च कुळातील असल्याचा दाखला देतो. तोंडातून वाणी बाहेर पडताच तो कोणत्या कुळात जन्मला हे कुळाचे मोठेपण प्रथम कळते. म्हणूनच माणसाने आपल्या कुळाच्या अभिमानासाठी चांगली आणि गोड भाषा वापरली पाहिजे.

।। न पुत्रसंस्पर्शात् परं सुखम् ।।

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात पुढे म्हटले आहे की, पुत्रप्राप्तीपेक्षा मोठे दुसरे सुख नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते पुत्रप्राप्ती हे सांसारिक सुखांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. बहुधा या सृष्टीची परंपरा पुढे नेण्यासाठीच निर्मात्याने आईवडिलांच्या मनात पुत्राची ओढ निर्माण केली असावी.

।। निशान्ते कार्यं चिन्तयेत्।।

आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने दररोज सकाळी दिवसभरातील कामांचा विचार केला पाहिजे. माणसाला सकाळी उठल्यावर दिवसभर काय कार्यक्रम आहे याचा विचार करायला हवा. याचा विचार केल्याने कामांबाबतची कोंडी संपते आणि त्याचा संपूर्ण दिवस ठरलेल्या वेळापत्रकानुसार जातो.

|| विवादे धर्ममनुस्मरेत् ||

या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी वादाच्या वेळी धर्मानुसार वागावे असे सांगितले आहे. चाणक्य म्हणतो की, परस्पर भांडण किंवा कलहाच्या वेळी धर्माची काळजी घेतली पाहिजे. धर्म विसरता कामा नये. जो माणूस भांडणाच्या वेळीही धर्माचे स्मरण करतो, तो महापाप करण्यापासून वाचतो, कारण भांडणाच्या वेळी माणूस रागाच्या भरात काहीही करू शकतो, त्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.