AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : अशा जागेवर राहणारे श्रीमंत देखील बनतात गरीब, चाणक्य म्हणतात लगेच जागा बदला

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Neeti : अशा जागेवर राहणारे श्रीमंत देखील बनतात गरीब, चाणक्य म्हणतात लगेच जागा बदला
| Updated on: Aug 11, 2025 | 6:19 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य निती नावाचा ग्रंथ लिहीला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही काळाशी सुसंगत वाटतात. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे पैशांचा व्यवहार कसा असावा? याबाबत देखील त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक विचार मांडले आहेत. थोडक्यात आयुष्य जगत असताना काय करावं? आणि कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे.

चाणक्य म्हणतात काही माणसं ही जन्मताच धनवान असतात, मात्र आयुष्यात ते काही अशा गोष्टी करतात ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. ते गरीब बनतात. तर काही लोक हे जन्माने गरीब असतात, मात्र ते त्यांच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धन कमवतात, असे लोक हे श्रेष्ठ असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दरम्यान चाणक्य यांनी अशी काही ठिकाणं सांगितली आहे, जिथे चुकूनही न थांबण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, अन्यथा तुम्ही देखील गरीब व्हाल असं त्यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?

जिथे रोजगार मिळणार नाही – चाणक्य म्हणता ज्या जागी तुम्हाला रोजगार मिळणार नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही वास्तव्य करू नका, कारण तुम्हाला जर रोजगार मिळाला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमची संपत्ती विकूनच संसार करावा लागेल, त्यामुळे अशा ठिकाणी कधीही थांबू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

व्यसनाधीन लोक – चाणक्य म्हणतात ज्या जागी व्यसानाधीन लोक आहेत, अशा जागी वास्तव्य म्हणजे सर्वात मोठा धोका असतो. यामुळे तुम्हाला देखील व्यसनाची सवय लागते, तुमचं आयुष्य बरबाद होतं. पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

योग्य मोबदला न मिळणं – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला एखाद्या जागी कामाचा योग्य मोबदला मिळत नसेल तर तिथे चुकूनही थांबू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.