AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : मुलांना या गोष्टींपासून नेहमी दूर ठेवा, चाणक्यांचा पालकांना सल्ला

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होतेच, परंतु ते एक चांगले शिक्षक देखील होते. चाणक्य म्हणतात मुलांच्या जडणघडणीमध्ये आई-वडिलांचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांचं संगोपन करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

Chanakya Niti : मुलांना या गोष्टींपासून नेहमी दूर ठेवा, चाणक्यांचा पालकांना सल्ला
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 8:45 PM
Share

आर्य चाणक्य हे एक चांगले शिक्षक देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये आई-वडिलांनी मुलांवर संस्कार कसे करावेत? मुलांच्या जीवनात आई-वडिलांची भूमिका काय असते? आदर्श आई-वडील कोणाला म्हणावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात मुलांवर योग्य संस्कार होणं गरजेचं असतं. मुलांवर आई-वडिलांनी योग्य संस्कार केले तर अशी मुलं आपल्या कुळाचं नावं मोठं करतात. आपल्या आई-वडिलांची मान जगात उंचावेल असं काम करतात. परंतु जर त्यांच्यावर संस्कार झाले नाहीत तर अशी मुलं वाईट वळणाला लागतात. ते आयुष्यात फार काही करू शकत नाहीत. परिणामी अशी मुलं आपल्या कुटुंबाचं तर वाटोळं करतातच परंतु अशी मुलं त्या राष्ट्रासाठी देखील ओझं असतात. कारण सशक्त आणि संस्कारशील तरुण पिढी ही कोणत्याही राष्ट्रासाठी मोठी संपत्ती असते. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना काही गोष्टींपासून दूर ठेवावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

खोटे बोलण्याची सवय – आर्य चाणक्य म्हणतात प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य आहे की, त्यांनी आपल्या मुलांवर सत्य बोलण्याचे संस्कार करावेत. परिस्थिती कशी असो माणसानं सत्य बोललंच पाहिजे, त्यामुळे मुलांना खोटं बोलण्याची सवय लागू देऊ नका.जर मुलांना खोटं बोलण्याची सवय लागली तर भविष्यात अशा व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, त्याचं आयुष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे आपल्या मुलांना नेहमी सत्य बोलण्याची सवय लावा, असा सल्ला चाणक्य यांनी दिली आहे.

मुलांना योग्य, अयोग्य गोष्टींची जाणीव करून द्या – चाणक्य म्हणतात लहान मुलं ही खोडकर असतात. ते तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतीलच असं नाही, त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन, प्रेमाने चूक आणि बरोबर यातील फरक समजून सांगावा. त्यांची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी चालना द्यावी.

आळस – चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्यामुळेच आई-वडिलांनी मुलांवर नेहमी श्रमप्रतिष्ठेचे संस्कार करावेत. त्यांना त्याच्या वयानुसार काही छोटी-मोठी काम सांगावीत. योग्य वेळेत अभ्यास पूर्ण करून घ्यावा. ज्या मुलांना त्यांच्या लहानपणी श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व समजतं, अशी मुलं आयुष्यात प्रचंड प्रगती करतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.